शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यातील १७८ गावांना पाणी टंचाईच्या झळा

By admin | Updated: February 21, 2017 16:40 IST

फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 21 : फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ७ कोटी ३५ लाखांचा आराखडा तयार केला आहे.गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक आहे. मात्र पाण्याचे होणारे बाष्पीभवन तसेच कृषी व अन्य क्षेत्रासाठी होणारा वापर यामुळे धरणक्षेत्रातील जलसाठा कमी होत असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.१७८ गावांमध्ये पाणी टंचाईजिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यात यावर्षी जिल्हाभरात ४४३ गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तविली आहे. त्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या दरम्यान ६३ गावांमध्ये तर जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवणार आहे. तर एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत २०२ गावांमध्ये पाणी टंचाई असणार आहे. सद्यस्थितीला अमळनेर तालुक्यात ४८, भडगाव ४, बोदवड १२, चाळीसगाव ९, चोपडा २५, धरणगाव २३, एरंडोल १६, जळगाव ३, जामनेर १२, मुक्ताईनगर ७, पारोळा १७, रावेर २ अशी गावनिहाय पाणी टंचाईची स्थिती राहणार आहे.७ कोटी ३५ लाखांची उपाययोजनाजिल्ह्यातील ४४३ गावांमधील संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ३५ लाख ५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यात विहिर खोलीकरणासाठी १३ लाख १० हजार, शेवड्या घेण्यासाठी ३ लाख ६० हजार, खाजगी विहिर अधिग्रहणासाठी १ कोटी ११ लाख,  टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी ७८ लाख,  नवीन विंधन विहिर तसेच कुपनलिका ताब्यात घेण्यासाठी एक कोटी ८१ लाख ३ हजार, नळ योजना दुरुस्त करण्यासाठी १ कोटी ८२ लाख, तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ६५ लाख विंधन विहिर दुरुस्तीसाठी ५० हजार अशा उपाययोजनांचा समावेश आहे.६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. सद्यस्थितीला ६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील टँकरची संख्या ही ४३ पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.