शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यातील १७८ गावांना पाणी टंचाईच्या झळा

By admin | Updated: February 21, 2017 16:40 IST

फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 21 : फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ७ कोटी ३५ लाखांचा आराखडा तयार केला आहे.गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक आहे. मात्र पाण्याचे होणारे बाष्पीभवन तसेच कृषी व अन्य क्षेत्रासाठी होणारा वापर यामुळे धरणक्षेत्रातील जलसाठा कमी होत असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.१७८ गावांमध्ये पाणी टंचाईजिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यात यावर्षी जिल्हाभरात ४४३ गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तविली आहे. त्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या दरम्यान ६३ गावांमध्ये तर जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवणार आहे. तर एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत २०२ गावांमध्ये पाणी टंचाई असणार आहे. सद्यस्थितीला अमळनेर तालुक्यात ४८, भडगाव ४, बोदवड १२, चाळीसगाव ९, चोपडा २५, धरणगाव २३, एरंडोल १६, जळगाव ३, जामनेर १२, मुक्ताईनगर ७, पारोळा १७, रावेर २ अशी गावनिहाय पाणी टंचाईची स्थिती राहणार आहे.७ कोटी ३५ लाखांची उपाययोजनाजिल्ह्यातील ४४३ गावांमधील संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ३५ लाख ५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यात विहिर खोलीकरणासाठी १३ लाख १० हजार, शेवड्या घेण्यासाठी ३ लाख ६० हजार, खाजगी विहिर अधिग्रहणासाठी १ कोटी ११ लाख,  टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी ७८ लाख,  नवीन विंधन विहिर तसेच कुपनलिका ताब्यात घेण्यासाठी एक कोटी ८१ लाख ३ हजार, नळ योजना दुरुस्त करण्यासाठी १ कोटी ८२ लाख, तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ६५ लाख विंधन विहिर दुरुस्तीसाठी ५० हजार अशा उपाययोजनांचा समावेश आहे.६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. सद्यस्थितीला ६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील टँकरची संख्या ही ४३ पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.