शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यात भिकारीमुक्त मोहीम: स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:53 IST

राज्यात भिका-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहत राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात ‘भिकारीमुक्त मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल शिंदे पुणे : राज्यात भिका-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहत राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात ‘भिकारीमुक्त मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.उपजीविकेसाठी स्थलांतर, शारीरिक विकलांगता, कुटुंबापासून बेघर होणे यासंह अनेक कारणांमुळे शहरांमध्ये भिकाºयांची संख्या वाढत आहे. ‘भिकारीमुक्त महाराष्ट्र’ ही कल्पना सत्यात उतविणे आवघड आहे. परंतु, पुण्यात धर्मादाय आयुक्त म्हणून काम करत असताना सध्याचे राज्य आयुक्त शिवकुमार डिगे यांनी २०१५ मध्ये ‘भिकारीमुक्त पुणे’ ही कल्पना मांडली होती. पुण्यातील २० ते २५ संस्थांनी ही मोहिम राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. भिकाºयांना रोजगारासह मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. काही संस्था भिकाºयांसाठी काम करतात. मात्र, राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयानेच महाराष्ट्रात भिकारी मुक्त मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना पाठबळ मिळणार आहे.पुण्यात जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भिकाºयांच्या मुलांसाठी गेल्या काही वर्षांपासून काम केले जात आहे. सुमारे दीड हजार मुलांच्या शिक्षणाची व आरोग्याची काळजी घेण्याचे काम फाऊंडेशन करत आहे. डिगे यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार जनसेवा फाऊंडेशनने विविध भागातील भिकाºयांचा शोध घेतला. लहान मुलांना दररोज शाळेत पाठवून त्यांच्यात सुधारणा करण्याबाबत एक यंत्रणा तयार केली. त्यामुळे भीक मागणाºया मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा म्हणाले, लिंबू- मिरचीचा किंवा डोंबाºयाचा खेळ करून उपजीविका करणाºया पालकांचे समुपदेशन करणे हे मोठे आव्हान आहे. संस्थेकडून ५० मुलांच्या मागे एक शिक्षक आणि २५० मुलांच्या मागे एक एमएसडब्ल्यू अधिकारी, अशी यंत्रणा काम करत आहे. सध्या १ हजार २०० मुले पालिकेच्या शाळेत तर ३०० मुले खासगी शाळेत शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :Beggerभिकारी