शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
5
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
6
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
7
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
8
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
9
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
10
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
11
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
12
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
13
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
14
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
15
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
16
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
17
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
18
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
19
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
20
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

बीड - नेतृत्वाविना निघाला विराट मराठा मुकमोर्चा

By admin | Published: August 30, 2016 4:48 PM

सामाजिक संवेदनेतून आपल्या भावना मुकपणे व्यक्त करण्यासाठी आलेल्या पाच लाख लोकांनी काढलेल्या मोर्चाची नोंद बीडच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात झाली आहे

- प्रताप नलावडे / ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 30 - कोणा एकाचे नेतृत्व नाही आणि कोणताही चेहरा नाही तरीही सामाजिक संवेदनेतून आपल्या भावना मुकपणे व्यक्त करण्यासाठी आलेल्या पाच लाख लोकांनी काढलेल्या मोर्चाची नोंद बीडच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात झाली आहे. लोकांनी सकाळपासून ते पार मोर्चा संपेपर्यंत आणि संपल्यानंतरही शिस्तीचे घडविलेले दर्शनही अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.
 
कोपर्डीच्या अत्याचाराच्या घटनेने व्यथित झालेल्या समाजाची उमटलेली ही मुक प्रतिक्रिया अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात किती बोलकी होती, हेही बीडकरांनी मंगळवारी अनुभवले. गेली पंधरा दिवसांपासून मराठा क्रांती मुक मोर्चाची जिल्ह्यात चर्चा सुरू होती. या मोर्चाला कोणा एकाचे नेतृत्व नव्हते तर उत्स्फुर्तपणे उमटलेली ही सामुदायिक प्रतिक्रिया होती. एरवी मोर्चा म्हटले की चार दोन लोकांचे नेतृत्व आणि त्या नेत्याच्या नावावर गोळा होणारे लोक, असे समिकरण असते. या मोर्चात मात्र कोणताही राजकीय चेहरा नव्हता, कोणताही नेता नव्हता, कोणाच्याही नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन नव्हते. मोर्चात सहभागी झालेला प्रत्येकजण मी या मोर्चात असले पाहिजे, या भावनेने सहभागी झाला होता. त्यामुळे प्रत्येकाने स्वंयप्रेरणेने मोर्चातील शिस्तही पाळली.
मोर्चाची सुरूवात स्टेडियम कॉम्पलेक्समधून होणार होती. याठिकाणी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक जमा होत राहिले. लोक मोर्चासाठी येत होते, त्यावेळीही त्यांच्यासोबत कोणी नेता नव्हता. लोकांनी लोकांच्यासाठी लोकभावनेतून काढलेला मोर्चा असेच या मोर्चाचे वर्णन करावे लागेल. आजवर बीडमध्ये अनेक मोर्चे निघाले. परंतु या सर्व मोर्चांचे रेकॉर्ड बे्रक करणारा हा मोर्चा ठरला. 
मोर्चातील महिलांचा सहभागही खूपच लक्षवेधी होता. पुरूषांच्या बरोबरीनेच महिलाही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आमच्या मुलीबाळींवर अत्याचार होत असताना आम्ही घरात कशा काय बसणार, असा त्यांचा सामुदायिक सवाल ऐकायला मिळत होता. ग्रामीण भागातूनही खूप मोठ्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चात रोजगार बुडवून आलेल्या महिला जशा होत्या, तसेच रजा टाकून खास मोर्चासाठी आलेल्या नोकरदार महिलाही होत्या. कधीही घराच्या बाहेर पडल्या नाहीत, अशा घरातील महिलांनीही हाताला काळी रेबीन बांधून आणि हातात भगवा झेंडा घेऊन नोंदविलेला आपला सहभाग खूपच बोलका होता.
बीड शहरातील जातीय सलोखाही किती मजबुत आहे, हे या मोर्चाच्या निमित्ताने दिसून आले. मोर्चा जेव्हा बशीरगंज या मुस्लीम इलाक्यातून जात होता, त्यावेळी येथील मुस्लीम नागरिकांनी आणि तरूणांनी मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मुस्लीम तरूणांनी मोर्चातील महिलांना पाण्याच्या पाऊचचे वाटप करून त्यांच्या संवेदनांशी आपणही तितकेच सहमत असल्याचे दाखवून दिले. मोर्चातील लोकांची व्यवस्था करण्यासाठी दोन हजार स्वयंसेवक राबत होते. पिण्याच्या पाण्यापासून ते अल्पोपहारापर्यंची सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. 
ऐरवी मोर्चाचे श्रेय लाटण्यासाठी चढाओढ लागलेली असते. परंतु या मोर्चात मात्र श्रेय घेण्याचा कुठेही कुणीही प्रयत्न केला नाही. अगदी पहाटेपासून मोर्चात सहभागी असणाºयांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करणाºया तरूणाला ही व्यवस्था कोण कोण करत आहे, असे विचारल्यावर त्याने नम्रपणे आपले नाव कोठेही प्रसिध्द करू नका, आम्ही सगळेजणच हे काम करतोय, त्यामुळे कोणा एकाला श्रेय नको, असे सांगितले. हीच गत मोर्चाचे पंधरा दिवसापासून दिवसरात्र नियोजनात गुंतल्या मंडळींचेही होते. ‘मराठा समाज’ या नावाखाली ही सगळी मंडळी कार्यरत होती. शिवाजीराव पंडित यांच्यासारखे जिल्ह्यातील जेष्ठ नेतेही सतरंजीवर सगळ्यांसोबत नियोजनाच्या बैठकीत बसत होते.