शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

१२ डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, त्यात...; खासदार सोनवणेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:49 IST

६ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुखचा जीव वाचला असता. या प्रकरणी निलंबित झालेले पोलीस अधिकारी पाटील यांना सहआरोपी करा

बीड - २१ दिवस वाल्मिक कराडला मदत करणारे कोण आहेत, त्या सगळ्यांना सहआरोपी करा. एसआयटी नेमल्यानंतर कराडने सरेंडर केले असं सांगत खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, १२ डिसेंबरला वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर भेट झाली. खंडणीखोर आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर तिथून निघून गेला. मग पोलिसांनी सोडले का? गुन्हा झालेल्या आरोपीला पोलीस संरक्षासाठी गार्ड होते. नागपूर, दिंडोरी, गोवा सगळीकडे फिरून ते पुण्याच्या घरी कुणाकडे राहिले? ११ डिसेंबर ते ३१ डिसेंबर वाल्मिक कराडला कुणी मदत केली. या सर्वांना सहआरोपी का केले जात नाही. या आरोपींनाही मकोका लावला पाहिजे. एसआयटीतील नावे फायनल केल्यानंतर आरोपी पोलिसांकडे सरेंडर झाला असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या झाली पण याची सुरुवात २८ मे २०२४ ला झाली. २८ मे रोजी केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. रमेश घुले आणि अनोळखी व्यक्तीवर गुन्हा झाला. घुलेला अटक झाली पण अनोळखी कोण हे पोलिसांनी शोधले नाही. त्यावर पोलीस काही बोलत नाही. याचा अर्थ अनोळखीवर कुठलीही वाच्यता करायची नाही असं पोलिसांना सांगितले गेले. ही घटना ज्यादिवशी घडली त्यानंतर रमेश घुले नावाचा व्यक्ती कुठेही समोर आला नाही. पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्यामुळे तो कुठल्याही अवैध कामात पुढे आला नाही असं सोनवणे म्हणाले.

तसेच ६ डिसेंबरला आवाडा कंपनीच्या यार्डात काही हाणामारी झाली असं प्रथमदर्शनी दिसते परंतु याचीही सुरुवात २९ नोव्हेंबर २०२४ रोजी २ कोटींची खंडणी मागितली तेव्हा झाली. २९ च्या घटनेचा गुन्हा ११ डिसेंबरला नोंदवला गेला. खंडणी मिळाली नाही, पैशाचा व्यवहार पूर्ण झाला नाही म्हणून ६ डिसेंबरला आवाडा कंपनी परिसरात गुंड पाठवून दहशत निर्माण करणे, अधिकाऱ्यांना मारणे हे काम ७ जणांनी केले. कंपनीने जी सुरक्षा व्यवस्थेचं काम दिले ते बीड बाहेरील व्यक्तींना दिले. कंपनीला सुरक्षा पुरवण्याचं काम कुणाला दिले, केजमध्ये कुणी माणूस नव्हते का मग हे कोण आहेत? हेदेखील तपासण्याची गरज आहे. सुरक्षा गार्डला, अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर ६ तारखेला ते पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी केवळ तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपींना सोडून दिले. २८ मे २०२४, २९ नोव्हेंबर, त्यानंतर ६ डिसेंबरला या घटनेची सुरूवात झाली. या खंडणीखोरांनी कोणाकोणाला फोन केलेत. आता जो खंडणीचा गुन्हा झालेला अटकेत असलेला आरोपी आहे तो २९ तारखेला केजमध्ये होता. केजमध्ये एका प्लॉटची रजिस्ट्री करून घेतली. २९ नोव्हेंबरपासूनचे सीडीआर काढा अशी मागणी खासदारांनी केली.

दरम्यान, ६ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुखचा जीव वाचला असता. या प्रकरणी निलंबित झालेले पोलीस अधिकारी पाटील यांना सहआरोपी करा. ९ डिसेंबरला संतोषचं अपहरण केले त्यानंतर टॉर्चर करून क्रूर हत्या केली. ९ डिसेंबरनंतर मीडियाला ही बाब समजली. दुपारी साडे तीन वाजता संतोषचं अपहरण झाले. ४ वाजता धनंजय देशमुख पोलिसांकडे गेले, माझ्या भावाचं अपहरण झालेले आहे. विष्णु चाटेने ३० कॉल केले. साडे सहा वाजता संतोषचा मृतदेह सापडला. पोलिसांना हा मृतदेह सापडला. पोलीस यंत्रणेतला कोण यात सहभागी आहे? मृतदेह पोलीस वाहनात टाकला गेला ती गाडी फिरवून फिरवून केजच्या हॉस्पिटलला आणली. कळंबच्या दिशेने पोलीस वाहन का गेले हे महाराष्ट्रातील जनतेला कळालं पाहिजे. पोलीस यंत्रणेवर संशय घेणाऱ्या या गोष्टी आहेत असा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.  

टॅग्स :bajrang sonwaneबजरंग सोनवणेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे