शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘कपटी मित्रा’पासून सावध राहा

By admin | Updated: January 16, 2017 07:02 IST

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राजकीय पक्षांची एकमेकांवरील कुरघोडीही वाढत आहे.

मुंबई : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राजकीय पक्षांची एकमेकांवरील कुरघोडीही वाढत आहे. त्यात विशेषत: महापालिकेत सत्ताधारी असलेले शिवसेना-भाजपाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर प्रहार करत आहेत. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ‘कपटी आणि चाणाक्ष मित्रापासून सावध राहा’ असा सल्ला देत, मित्रपक्ष भाजपावर निशाणा साधला, तसेच या निवडणुकीत आपल्याला वेळप्रसंगी या कपटी मित्रासोबत लढावे लागू शकते, असा सावधगिरीचा इशारा देत, स्वबळाची तयारी ठेवण्याचे संकेत दिले.मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘मातोश्री’वर उमेदवार पडताळणीसाठीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी घाटकोपर आणि शिवाजीनगरमधील उपशाखाप्रमुख, उपविभागप्रमुखांशी विस्तृत चर्चा केली. या वेळी उद्धव यांनी शिवसैनिकांशी बोलताना हा सल्ला दिला. उद्धव ठाकरे यांचा सल्ला म्हणजे, अप्रत्यक्षरीत्या भाजपावरच निशाणा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. उद्धव यांच्या या विधानावर भाजपा आता काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. बैठकीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले की, आजपर्यंत आपण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्यातील फुटून गेलेल्या गद्दारांशी लढलो. इतकेच नाही तर रक्ताचे नाते असलेल्या नातेवाईकांशीही लढलो. मात्र या निवडणुकीत आपल्याला वेळप्रसंगी कपटी आणि चाणाक्ष मित्रांसोबत लढावे लागू शकते; त्यामुळे अशांपासून सावध राहा.दरम्यान, युतीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच पारदर्शकतेच्या मुद्यांवरून भाजपाकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. त्यात मुंबईमधील एका खासदाराने सेनेला सद्यपरिस्थितीचे ज्ञान आणि भान असावे असे वक्तव्य करून पुन्हा डिवचले आहे. त्यामुळे युतीची चर्चा सुरू होण्याआधीच दोन्ही पक्षात वाद अधिकच वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)आज युतीच्या वाटाघाटींना सुरुवातमुंबई महापालिकेसाठी शिवसेना,भाजपा युतीच्या वाटाघाटींना आजपासून सुरुवात होणार आहे. पालिकेतील जागावाटप आणि प्रत्येकी अडीच वर्षांसाठी महापौर पद हेच या वाटाघाटीतील कळीचे मुद्दे ठरणार आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर भाजपाने वाटाघाटीची जबाबदारी सोपविली आहे, तर शिवसेनेकडून राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर किल्ला लढविणार आहेत. सोमवारी युतीच्या वाटाघाटीतील चर्चेची पहिली फेरी होणार आहे.युतीच्या जागावाटपाचा तिढा सोडविण्यापूर्वी महापौरपद अडीच वर्षांसाठी यायला हवे, या मुद्द्यावर शिवसेनेची सहमती मिळविणे आमची प्राथमिकता असणार आहे. दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी अडीच वर्षांसाठी महापौर पद असावे, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे.त्यामुळे महापौर पदाबाबत काही ठरल्यानंतरच जागावाटपावर सहमत होऊ शकते, असे भाजपाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. वाटाघाटातील शिवसेनेच्या अटींबाबत शिवसेना नेत्यांनी मौन बाळगले आहे. मात्र, पक्षाच्या सर्वेक्षणात स्वबळाचा कौल मिळाला असल्याने भाजपाला जास्तीच्या जागा सोडण्यास शिवसेनेचा विरोध राहण्याची शक्यता आहे.