शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

शिक्षण विभागाची बनवाबनवी

By admin | Updated: February 2, 2015 04:49 IST

शिक्षक दिनी राज्यातील आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सरकारने सन्मानित केले

राजेंद्र वाघ, शहाडशिक्षक दिनी राज्यातील आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सरकारने सन्मानित केले खरे. मात्र पुरस्कारात दिले जाणारे १ लाख रुपये सहा महिने होऊनदेखील आदर्श शिक्षकांना न मिळाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाची बनवाबनवी चव्हाट्यावर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिले. २०१३-१४ या वर्षासाठी ३७ प्राथमिक शिक्षक, ३८ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी भागात काम करणारे शिक्षक, २ कला व क्रीडा क्षेत्रातील शिक्षक, १ अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक तर १ स्काऊट व १ गाईड अशा ९८ शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. मात्र ठाण्यातील ८ शिक्षकांना अद्याप पुरस्काराच्या १ लाख रुपये बक्षिसाचा लाभ मिळालेला नाही.पुरस्काराबाबत बनवाबनवी१९६२-६३पासून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढ, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ दिले जात होते. या वर्षीही पुरस्काराचे स्वरूप साधारण असेच होते. मात्र २००६मध्ये शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर वेतन आयोगात वेतनवाढीची तरतूद नसल्याचे कारण पुढे करीत या दोन जादा वेतनवाढी देणे बंद करण्यात आले. एवढेच नव्हेतर ज्या शिक्षकांना ही वेतनवाढ मिळाली होती ती थांबविण्यात आली. त्याऐवजी १० हजार ठोक रक्कम देण्यात येऊ लागली. २०१३मध्ये पुरस्कारात रोख रक्कम व लॅपटॉपही देण्यात आला. परंतु, पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुन्हा दोन जादा वेतनवाढ मिळावी या शिक्षक संघटनांच्या मागणीची दखल घेत वेतनवाढीऐवजी १ लाख रुपये इतकी ठोक रक्कम देण्याची घोषणा राज्य सरकारने केली.