शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

बस्तवाड ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: April 22, 2015 00:34 IST

तरुणांच्या जिद्दीचे फळ : पेयजल शुद्धिकरणाला लवकरच सुरुवात

रियाज मोकाशी - कोल्हापूरज्या समाजात जन्मलो, वाढलो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून तरुणांनी एकत्र येऊन गावातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. बस्तवाड (ता. शिरोळ) येथे बांधलेल्या कृष्णामाई पेयजल शुद्धिकरणाची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या बस्तवाड गावाला कृष्णा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, कृष्णा नदीत वाढलेल्या प्रदूषणामुळे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे दिसून आले. गावातील काही ठरावीक नागरिक फिल्टर केलेले बाटलीबंद पाणी पिण्यास बाहेरून आणत होते. मात्र, सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न होता. याच समस्येवर उपाय काढण्यासाठी गावातील काही तरुणांनी प्रयत्न सुरू केले. इर्शाद पाटील, संदीप जंगम, सुनील कोळी, संदीप लाटकर, राहुल कोळी यांसह गावातील तरुणांनी दीड वर्षांपासून यावर विचारविनिमय करून पाण्याचे शुद्धिकरण करण्यासाठी प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, उत्पन्नाचे साधन अधिक नसल्याने ग्रामपंचायतीला हा प्लांट उभारणे शक्य नव्हते. अखेर २५ जानेवारी २0१५ रोजी गावातीलच जिल्हा परिषदेची १0 बाय १५ इतकी जागा निवडली. या जागेत प्रथम कूपनलिका सुरू करून प्लांटच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यानंतर गाळा बांधकाम, पाण्याची टाकी आणि इतर वस्तूंच्या खरेदीस सुरुवात केली. गावातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, परिसरातील नेते, व्यावसायिक यांच्याकडून देणगी मिळाल्याने आर्थिक बाजू भक्कम होत गेली आणि कामासही वेग आला. एकूण साडेआठ लाखांपर्यंत यासाठी खर्च करण्यात आला आहे. सध्या या प्लांटचे काम पूर्ण झाले असून, लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यानंतर हा प्लांट ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यात येईल.गावसहभागातून उभारलेल्या पेयजलमुळे नागरिकांचे आरोग्य सुधारेल. यासाठी धडपडणाऱ्या तरुणांचे काम कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायतीकडूनही याची उत्तम देखभाल करून सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.- रावसाहेब कोळी, ग्रामसेवकदूषित पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेऊन केलेले काम निश्चितच चांगले आहे. ग्रामपंचायतीकडूनही पूर्ण सहकार्य राहील.- शमाबानू जमादार, सरपंच व्यवसाय सांभाळून समाजकार्यइर्शाद पाटील हे व्यावसायिक आहेत. संदीप जंगम पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर, सुनील कोळी पुणे येथे इंजिनिअर, तर संदीप लाटकर हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. या तरुणांनी स्वत:चा व्यवसाय सांभाळून समाजासाठी हे कार्य केले. तसेच स्वत:चाही आर्थिक वाटा उचलला.असे मिळणार पाणीनागरिकांना सुरुवातीला ग्रामपंचायतीकडून १00 रुपयांचे रिचार्ज कार्ड घ्यावे लागेल. त्यानंतर केव्हाही दोन रुपयांस १0 लिटर अशा दराने पाणी घेता येईल. मशीनमध्ये कार्ड दाखवून हवे तेवढे पाणी घेता येईल. मात्र, रिचार्ज संपल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये रिचार्ज करून घेता येईल. कार्ड एकदाच खरेदी करावे लागेल.