शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

बस्तवाड ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: April 22, 2015 00:34 IST

तरुणांच्या जिद्दीचे फळ : पेयजल शुद्धिकरणाला लवकरच सुरुवात

रियाज मोकाशी - कोल्हापूरज्या समाजात जन्मलो, वाढलो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून तरुणांनी एकत्र येऊन गावातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. बस्तवाड (ता. शिरोळ) येथे बांधलेल्या कृष्णामाई पेयजल शुद्धिकरणाची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या बस्तवाड गावाला कृष्णा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, कृष्णा नदीत वाढलेल्या प्रदूषणामुळे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे दिसून आले. गावातील काही ठरावीक नागरिक फिल्टर केलेले बाटलीबंद पाणी पिण्यास बाहेरून आणत होते. मात्र, सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न होता. याच समस्येवर उपाय काढण्यासाठी गावातील काही तरुणांनी प्रयत्न सुरू केले. इर्शाद पाटील, संदीप जंगम, सुनील कोळी, संदीप लाटकर, राहुल कोळी यांसह गावातील तरुणांनी दीड वर्षांपासून यावर विचारविनिमय करून पाण्याचे शुद्धिकरण करण्यासाठी प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, उत्पन्नाचे साधन अधिक नसल्याने ग्रामपंचायतीला हा प्लांट उभारणे शक्य नव्हते. अखेर २५ जानेवारी २0१५ रोजी गावातीलच जिल्हा परिषदेची १0 बाय १५ इतकी जागा निवडली. या जागेत प्रथम कूपनलिका सुरू करून प्लांटच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यानंतर गाळा बांधकाम, पाण्याची टाकी आणि इतर वस्तूंच्या खरेदीस सुरुवात केली. गावातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, परिसरातील नेते, व्यावसायिक यांच्याकडून देणगी मिळाल्याने आर्थिक बाजू भक्कम होत गेली आणि कामासही वेग आला. एकूण साडेआठ लाखांपर्यंत यासाठी खर्च करण्यात आला आहे. सध्या या प्लांटचे काम पूर्ण झाले असून, लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यानंतर हा प्लांट ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यात येईल.गावसहभागातून उभारलेल्या पेयजलमुळे नागरिकांचे आरोग्य सुधारेल. यासाठी धडपडणाऱ्या तरुणांचे काम कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायतीकडूनही याची उत्तम देखभाल करून सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.- रावसाहेब कोळी, ग्रामसेवकदूषित पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेऊन केलेले काम निश्चितच चांगले आहे. ग्रामपंचायतीकडूनही पूर्ण सहकार्य राहील.- शमाबानू जमादार, सरपंच व्यवसाय सांभाळून समाजकार्यइर्शाद पाटील हे व्यावसायिक आहेत. संदीप जंगम पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर, सुनील कोळी पुणे येथे इंजिनिअर, तर संदीप लाटकर हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. या तरुणांनी स्वत:चा व्यवसाय सांभाळून समाजासाठी हे कार्य केले. तसेच स्वत:चाही आर्थिक वाटा उचलला.असे मिळणार पाणीनागरिकांना सुरुवातीला ग्रामपंचायतीकडून १00 रुपयांचे रिचार्ज कार्ड घ्यावे लागेल. त्यानंतर केव्हाही दोन रुपयांस १0 लिटर अशा दराने पाणी घेता येईल. मशीनमध्ये कार्ड दाखवून हवे तेवढे पाणी घेता येईल. मात्र, रिचार्ज संपल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये रिचार्ज करून घेता येईल. कार्ड एकदाच खरेदी करावे लागेल.