शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अल्झायमरग्रस्तांना हव्यात पायाभूत सुविधा

By admin | Updated: September 21, 2016 02:30 IST

अल्झायमरग्रस्तांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे काम असते.

मुंबई : अल्झायमरग्रस्तांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे काम असते. त्याचबरोबरीने त्यांच्यासाठी पुनर्वसन केंद्र असण्याची गरज आहे. पण, देशात, राज्यात अशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अल्झायमरग्रस्तांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांनाही याचा खूप त्रास सहन करावा लागतो. अल्झायमर या आजारात मेंदू आक्रसला जात असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. प्राथमिक अवस्थेत वागण्यात बदल होतात. पण, त्यानंतर शारीरिक बदल दिसून येतात. त्यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अल्झायमरग्रस्तांना एकटे सोडू नये असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे कालांतराने त्यांच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाही याचा त्रास होऊ लागतो, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. तसेच अल्झायमरग्रस्तांना घरी काळजी घेणाऱ्या प्रशिक्षित व्यक्ती असायला हव्यात. त्याचबरोबर वेळीच या रुग्णांना औषधोपचार सुरू करण्याची गरज असते. त्यामुळे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)