शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

कालबाह्य कायद्याचा नगरविकासात अडसर

By admin | Updated: March 16, 2015 02:32 IST

नगर परिषदांच्या समित्यांचे आर्थिक अधिकार वाढवण्यासाठी शासनाने २०१२ साली कायद्यात बदल केला़ त्याचवेळी आर्थिक अधिकार वेळोवेळी वाढवण्याचे

प्रमोद आहेर, शिर्डीनगर परिषदांच्या समित्यांचे आर्थिक अधिकार वाढवण्यासाठी शासनाने २०१२ साली कायद्यात बदल केला़ त्याचवेळी आर्थिक अधिकार वेळोवेळी वाढवण्याचे अधिकारही स्वत:कडे घेतले़ मात्र अद्यापही शासनाने हे अधिकार वापरले नाहीत व नगर परिषदांना पूर्वीचेही अधिकार राहिले नसल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे़कायद्यातील बदलानंतर घेतलेले आर्थिक निर्णय कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे़ १९६५च्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या नगर परिषदांना स्वत:चे अधिकार देण्याकरिता १९९३च्या ७४व्या घटना दुरुस्तीपर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नाहीत़ या घटना दुरुस्तीने नगर परिषदांना स्वत:चे अस्तित्व व नागरी जीवनात आमूलाग्र बदलाची संधी मिळाली़विकासाला चालना मिळण्याची चिन्हे दिसत असतानाच खुल्या अर्थव्यवस्थेने शहरीकरणाला वेग मिळाला. परंतु त्या तुलनेत नगर परिषदांची क्षमता न वाढल्याने शहरांना समस्यांची कीड लागली़ आता या समस्यांनी उग्र रूप धारण केल्याने नगर परिषदा मूलभूत समस्या हाताळण्यात अपयशी ठरताहेत़ त्याच्या मुळाशी अधिकार, उत्पन्न व प्रशासनाच्या समस्या आहेत़ब्रिटिश काळातील कायद्यांवर बनवण्यात आलेल्या १९६५च्या कायद्यात अद्यापही कायदेकारी व कार्यकारी अंगे केंद्र व राज्याप्रमाणे वेगवेगळी नाहीत़ त्यामुळे निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असतो़ त्यामुळे शासनाची धोरणे मतदारांवर विपरीत परिणाम करणारी असल्यास त्याची अंमलबजावणी करणे प्रशासनास अवघड होते़ उदाहरणार्थ चतुर्थवार्षिक आकारणी, घरपट्टी व पाणीपट्टीतील वाढ, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण निष्कासन आदी विषयांकडे बघता येईल.बीओटीचे धोरण विकासाला लाभप्रद ठरत असताना त्यासाठीचे प्रस्ताव वर्षानुवर्षे शासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने नगर परिषदांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो़ याकरिता हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर द्यायला हवेत़ मुख्य म्हणजे महानगरपालिकांचे कायदे नगर परिषदांना लागू होणे गरजेचे आहे़