शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कालबाह्य कायद्याचा नगरविकासात अडसर

By admin | Updated: March 16, 2015 02:32 IST

नगर परिषदांच्या समित्यांचे आर्थिक अधिकार वाढवण्यासाठी शासनाने २०१२ साली कायद्यात बदल केला़ त्याचवेळी आर्थिक अधिकार वेळोवेळी वाढवण्याचे

प्रमोद आहेर, शिर्डीनगर परिषदांच्या समित्यांचे आर्थिक अधिकार वाढवण्यासाठी शासनाने २०१२ साली कायद्यात बदल केला़ त्याचवेळी आर्थिक अधिकार वेळोवेळी वाढवण्याचे अधिकारही स्वत:कडे घेतले़ मात्र अद्यापही शासनाने हे अधिकार वापरले नाहीत व नगर परिषदांना पूर्वीचेही अधिकार राहिले नसल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे़कायद्यातील बदलानंतर घेतलेले आर्थिक निर्णय कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे़ १९६५च्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या नगर परिषदांना स्वत:चे अधिकार देण्याकरिता १९९३च्या ७४व्या घटना दुरुस्तीपर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नाहीत़ या घटना दुरुस्तीने नगर परिषदांना स्वत:चे अस्तित्व व नागरी जीवनात आमूलाग्र बदलाची संधी मिळाली़विकासाला चालना मिळण्याची चिन्हे दिसत असतानाच खुल्या अर्थव्यवस्थेने शहरीकरणाला वेग मिळाला. परंतु त्या तुलनेत नगर परिषदांची क्षमता न वाढल्याने शहरांना समस्यांची कीड लागली़ आता या समस्यांनी उग्र रूप धारण केल्याने नगर परिषदा मूलभूत समस्या हाताळण्यात अपयशी ठरताहेत़ त्याच्या मुळाशी अधिकार, उत्पन्न व प्रशासनाच्या समस्या आहेत़ब्रिटिश काळातील कायद्यांवर बनवण्यात आलेल्या १९६५च्या कायद्यात अद्यापही कायदेकारी व कार्यकारी अंगे केंद्र व राज्याप्रमाणे वेगवेगळी नाहीत़ त्यामुळे निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असतो़ त्यामुळे शासनाची धोरणे मतदारांवर विपरीत परिणाम करणारी असल्यास त्याची अंमलबजावणी करणे प्रशासनास अवघड होते़ उदाहरणार्थ चतुर्थवार्षिक आकारणी, घरपट्टी व पाणीपट्टीतील वाढ, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण निष्कासन आदी विषयांकडे बघता येईल.बीओटीचे धोरण विकासाला लाभप्रद ठरत असताना त्यासाठीचे प्रस्ताव वर्षानुवर्षे शासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने नगर परिषदांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो़ याकरिता हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर द्यायला हवेत़ मुख्य म्हणजे महानगरपालिकांचे कायदे नगर परिषदांना लागू होणे गरजेचे आहे़