शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
6
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
7
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
8
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
9
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
10
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
11
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
12
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
13
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
14
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
15
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
16
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
17
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
18
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
19
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
20
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...

बारी घाटात बस दरीत कोसळली, सुदैवाने जीविहानी टळली, तीन प्रवाशी किरकोळ जखमी

By admin | Updated: July 21, 2016 15:27 IST

अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली

ऑनलाइन लोकमतघोटी (नाशिक), दि. २१ : अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली.दरम्यान या बसचे पुढील बंपर तुटल्याने हि बस सुमारे दीड हजाराहून अधिक खोल दरीत कोसळल्यापासून वाचली.यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.

अकोले आगाराची अकोले हुन कसार्या ला जाण्यासाठी एम.एच.१४ ,बी,टी.११५८ हि बस कासर्या कडे सकाळी साडे आठ वाजता आगारातून निघाली होती.बसचालक मिश्चद्र घोडके व वाहक वर्पे हे चाळीस प्रवासी घेऊन सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बारी घाटातून येत असताना रस्त्यावरील एका खड्ड्यात बस आदळली.यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन बसचे ब्रेक निकामी झाले.अशा स्थितीत बस उजव्या बाजूला खोल दरीत गेली.

दरम्यान बस ने रस्ता सोडल्यामुळे बस खाचरात आदळत गेल्याने पुढील काही साहित्य तुटून ते जमिनीत रोवल्यामुळे हि बस खोल दरीच्या अवघ्या काही फुटाच्या अंतरावर थांबविब्यात चालकाला यश आले.यामुळे सुदैवाने बस मधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.यात चालकासह चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून जखमी प्रवाशांना उपचारार्थ अकोले येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कमलेश बच्छाव हवालदार नितीन भालेराव ,चारोस्कर आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ रु ग्णालयात हलविले.

मोठा अनर्थ टळलादरम्यान या बसमधील चाळीस प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून हि बस सुमारे पंधराशे फूट खोलीच्या दरीच्या अवघ्या दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर थांबली.हि बस पुढे गेली असती तर माळशेज घाटात मागील वर्षी जाणार्या अपघाताची पुर्नरावृत्ती झाली असती.व अनेकांचा बळी गेला असता.केवळ चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.संरक्षण भीती नसल्याने बारी घाट बनला अपघाताचे केंद्रनगर आण नाशिक जिल्ह्याला जोडणार्या या बारी घाटात गेली काही वर्षापासून अनेक अपघात झाले आहेत.या घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकही दिशादर्शक फलक नसल्याने,तसेच संरक्षण भिंती अथवा जाळ्या नसल्याने अपघात वाढत आहेत.या घाटात जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.