शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

बारी घाटात बस दरीत कोसळली, सुदैवाने जीविहानी टळली, तीन प्रवाशी किरकोळ जखमी

By admin | Updated: July 21, 2016 15:27 IST

अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली

ऑनलाइन लोकमतघोटी (नाशिक), दि. २१ : अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली.दरम्यान या बसचे पुढील बंपर तुटल्याने हि बस सुमारे दीड हजाराहून अधिक खोल दरीत कोसळल्यापासून वाचली.यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.

अकोले आगाराची अकोले हुन कसार्या ला जाण्यासाठी एम.एच.१४ ,बी,टी.११५८ हि बस कासर्या कडे सकाळी साडे आठ वाजता आगारातून निघाली होती.बसचालक मिश्चद्र घोडके व वाहक वर्पे हे चाळीस प्रवासी घेऊन सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बारी घाटातून येत असताना रस्त्यावरील एका खड्ड्यात बस आदळली.यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन बसचे ब्रेक निकामी झाले.अशा स्थितीत बस उजव्या बाजूला खोल दरीत गेली.

दरम्यान बस ने रस्ता सोडल्यामुळे बस खाचरात आदळत गेल्याने पुढील काही साहित्य तुटून ते जमिनीत रोवल्यामुळे हि बस खोल दरीच्या अवघ्या काही फुटाच्या अंतरावर थांबविब्यात चालकाला यश आले.यामुळे सुदैवाने बस मधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.यात चालकासह चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून जखमी प्रवाशांना उपचारार्थ अकोले येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कमलेश बच्छाव हवालदार नितीन भालेराव ,चारोस्कर आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ रु ग्णालयात हलविले.

मोठा अनर्थ टळलादरम्यान या बसमधील चाळीस प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून हि बस सुमारे पंधराशे फूट खोलीच्या दरीच्या अवघ्या दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर थांबली.हि बस पुढे गेली असती तर माळशेज घाटात मागील वर्षी जाणार्या अपघाताची पुर्नरावृत्ती झाली असती.व अनेकांचा बळी गेला असता.केवळ चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.संरक्षण भीती नसल्याने बारी घाट बनला अपघाताचे केंद्रनगर आण नाशिक जिल्ह्याला जोडणार्या या बारी घाटात गेली काही वर्षापासून अनेक अपघात झाले आहेत.या घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकही दिशादर्शक फलक नसल्याने,तसेच संरक्षण भिंती अथवा जाळ्या नसल्याने अपघात वाढत आहेत.या घाटात जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.