शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा मोरया रे

By admin | Updated: September 13, 2015 05:05 IST

गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप खूपच वेगळे आहे; परंतु पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये एक निराळा आनंद होता. वेगळेपण होते. सांस्कृतिक संदर्भ आणि भक्कम आधारही होते.

- रमेश सहस्रबुद्धेगणेशोत्सवाचे आजचे स्वरूप खूपच वेगळे आहे; परंतु पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये एक निराळा आनंद होता. वेगळेपण होते. सांस्कृतिक संदर्भ आणि भक्कम आधारही होते. गणेशोत्सवातील प्रथा-परंपरांच्या बदलत गेलेल्या प्रवासाकडे टाकलेला दृष्टिक्षेप...भारतीय परंपरेनुसार कोणत्याही शुभकार्याप्रसंगी प्रथम गणपतीचे पूजन करतात, असे का? याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. ‘गण’ म्हणजे अष्टवसूंचा समूह. ‘वसू’ म्हणे दिशा. गणपती म्हणजे अष्टदिशांचा स्वामी. इतर देवता गणेशाच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणूनच कोणत्याही देवतेची पूजा अथवा मंगलकार्य करताना प्रथम गणेशपूजन करतात. गणपतीने एकदा का दिशा मोकळ्या केल्या, की ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती तेथे येऊ शकते. यालाच महागणपती पूजन असे म्हणतात. जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या विस्फुटित लहरींचा समूह म्हणजे गण आणि त्याचे निमंत्रण करणारा तो गणपती. विनाशकारक व तमप्रधान अशा तीनशे साठ यमलहरी विविध दिशांतून अव्याहतपणे प्रवास करत असतात; परंतु गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशीपर्यंत गणेश लहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी होते. यासाठीच गणपतीची या काळात आराधना केली जाते.इसवी सन १९३०-४०च्या दरम्यान पुण्यात सार्वजनिक गणपतीपुढे पुढाऱ्यांची व्याख्याने होत. पट्टीचे वक्ते व्याख्यानासाठी गायकवाडवाड्यात हजेरी लावून जात. वक्त्यांच्या अनुचित विधानानंतर वादळेही माजत. व्याख्यानांव्यतिरिक्त या काळी नामवंत गायकांच्या गायनाचे कार्यक्रम आणि काव्यगायनेही गणपतीसमोर होत; तरीही गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असे ते मेळ्यांचे. अशा मेळ्यांची एकूण संख्या त्या काळी पन्नास-साठ असावी. प्रामुख्याने सारस्वत व ब्राह्मणांची वस्ती असलेल्या मुंबईतील शांताराम चाळीच्या गणेशोत्सवास १८९४मध्ये प्रारंभ झाल्याचे जुन्या कागदपत्रांवरून आढळते. हा गणेशोत्सव १८९७पर्यंत साजरा झाला. त्यानंतर १८९८ ते १९००पर्यंत उत्सव बंद पडला. प्रथम दुष्काळ, त्यानंतर प्लेग, मग ब्रिटिशांची दडपशाही, टिळकांना झालेली कारावासाची शिक्षा, यामुळे तेथील गणेशोत्सव बंद पडला असावा. शांताराम चाळीचा गणेशोत्सव बंद पडणे, लोकमान्य टिळकांना रुचले नाही. अखेर चाळीतील रहिवाशांची सभा होऊन हा उत्सव पुन्हा सुरू करण्याचे ठरले. कै. विष्णुपंत राशिनकर यांनी उत्सवास पहिली वर्गणी दिली. मग १६ सप्टेंबर १९०१ रोजी लोकमान्य टिळकांनी स्वहस्ते शांतारामच्या चाळीत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सवास धीराने उभे केले. सन १९०१पासून आजतागायत हा गणेशोत्सव सुरू आहे. या चाळीतील गणेशोत्सवाचा शतक महोत्सवी सोहळा १ ते १२ सप्टेंबर २००० या काळात साजरा झाला होता.कायमस्वरूपी मूर्ती बनविण्याचा काळ...कायमस्वरूपी गणेशमूर्ती फक्त गणेशोत्सवाच्या काळात ठेवण्यात येऊ लागल्या. पूजेसाठी मात्र, छोट्या मूर्ती असून, त्या बोलविल्या जात. मात्र, या मोठ्या कायमस्वरूपी मूर्ती बोलविल्या जात नसत. पुण्यातील खडकावरील खेडकरांचा लाकडी गणपती, हत्ती गणपती, ही त्याची उदाहरणे होत. आजही अनेक गणेशोत्सव मंडळांच्या मोेठ्या मूर्ती या कायमस्वरूपी असतात.गणेशाची विडंबनरूपे...दुसऱ्या महायुद्धापासून गणेशमूर्तीची विडंबनरूपे करण्यात येऊ लागली. गणपतीच्या मूर्तींना ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांची रूपे देण्यात आली. त्यानंतर सामाजिक चित्रपटांच्या दृश्यातही गणेशमूर्ती आकार घेऊ लागल्या. ‘आवारा’ चित्रपटातील राज कपूर, नर्गिसच्या प्रणयदृश्यातील गणेशमूर्ती, राजकमलच्या ‘रामजोशी’तील सवाल-जबाबच्या दृश्यातील गणेशमूर्ती, तसेच पुढारी, पोस्टमन, शेतकरी आणि सध्या बालचमूंमध्ये प्रसिद्ध असलेल्या बाहुबली रूपातील गणेशमूर्तीपण दिसू लागल्या. शिवाजी महाराज, सुभाष बाबू, जवाहरलाल नेहरू ही मंडळी; पण गणेशरूपात दिसू लागली. त्यामुळे भाविकभक्तांच्या भावना दुखावू लागल्याने गणेशमूर्तींची विडंबनरूपातील प्रदर्शनेबंद झाली.