शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
3
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
4
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
5
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
6
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
7
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
8
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
9
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
10
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
11
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
12
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
14
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
15
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
16
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
17
अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला
18
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
19
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
20
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले बँकांचे दलाल, आ़ बच्चु कडू यांचा सोलापूरात आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 13:15 IST

सोलापूर दि ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांची कर्जमाफी केली, पण आधी बँकांचे पैसे भरा मगच तुम्हाला कर्जमाफी मिळेल असे वक्तत्व करून बँक कर्जाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री काम करीत आहे त्यांना शेतकºयांची काळजी नाही़ त्यामुळे फडणवीस हे शेतकºयांचे वाली नसून बँकांचे दलाल असा घणाघाती आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ़ बच्चु कडू यांनी केला़

ठळक मुद्देशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कर्जमाफी योजनेला देऊन राजांचा खरा अपमान केलाऊस उत्पादकांना आता न्याय देण्यासाठी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे लागेलऊस उत्पादक शेतकºयांना आता वाली उरला नाही़

सोलापूर दि ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांची कर्जमाफी केली, पण आधी बँकांचे पैसे भरा मगच तुम्हाला कर्जमाफी मिळेल असे वक्तत्व करून बँक कर्जाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री काम करीत आहे त्यांना शेतकºयांची काळजी नाही़ त्यामुळे फडणवीस हे शेतकºयांचे वाली नसून बँकांचे दलाल असा घणाघाती आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ़ बच्चु कडू यांनी केला़अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील, जिल्हाध्यक्ष राजसाहेब चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व विविध पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते़पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कर्जमाफी योजनेला देऊन राजांचा खरा अपमान केला आहे़ या सरकारला शेतकºयांची कधीच काळजी नाही़ २००० उद्योगपतीचे १ लाख ४० हजार कोटीचे कर्ज सरकारने माफ केले़ तेव्हा कुठे त्यांचा फॉर्म भरून घेतला होता़ भरून घेतला असेल तर तो दाखवावा़ आणि इकडे मात्र शेतकºयांची छळवणुक करीत आहेत़ तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला़-----------ऊस दराच्या आंदोलनात उतरणारपश्चिम महाराष्ट्र हा ऊसाचा पट्टा आहे़ या परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांना आता वाली उरला नाही़ शेतकरी संघटना आपापसात भांडण्यात व्यस्त आहेत़ त्यामुळे ऊस उत्पादकांची परवड होऊ नये यासाठी आ़ बच्चु कडू यांनी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे अशी विनंती शेतकºयांनी केली़ यावर बोलताना आ़ बच्चु कडू म्हणाले की, कापसाच्या आंदोलनाने न्याय मिळाला़ पण शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्या इतका न्याय मिळाला नाही़ आजही सरकारी अनास्थेमुळे या आत्महत्या होतच आहेत़ त्याचे लोन आता पश्चिम महाराष्ट्रात पोहचले आहे़ ऊस उत्पादकांना आता न्याय देण्यासाठी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला़