शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

धक्कादायक! मुंबईत बांगलादेशी घुसखोर महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:48 IST

Ladki Bahin Yojana: विरोधक सातत्याने लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका करत असून, बांगलादेशातून आलेल्या घुसखोर महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे म्हटले जात आहे.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरली. लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर महायुती सरकारने ही योजना आणली. राज्यात ही योजना प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. यातच या योजनेवरून विरोधक महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एकीकडे ही योजना बंद केली जाणार असल्याचे दावे करताना दुसरीकडे या योजनेसाठी आश्वासित केलेले २१०० रुपये कधीपासून देणार, अशी विचारणाही करत आहेत. यातच आता बांगलादेशातून घुसखोरी करून मुंबईत राहत असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महायुती सरकारची नवीन टर्म सुरू झाल्यापासून लाडकी बहीण योजनेची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, यामुळे या छाननीत अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून मिळालेल्या पैशांची वसुली केली जाऊ शकते, अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. यावर, राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. छाननी प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यास ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत, हे अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे शासन परत घेणार की नाही, त्याविषयी गैरसमज पाहायला मिळत आहेत. एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे शासनाला परत करायचे असतील तर नियोजन विभाग विंडो तयार करून देतील. आम्ही कुणाचेही पैसे स्वतःहून परत घेणार नाही, ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील, असेही अदिती तटकरे म्हणाल्या.

मुंबईतबांगलादेशी घुसखोर महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ?

एकीकडे बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांबाबत केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कडक पावले उचलताना पाहायला मिळत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर आढळून आले आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चर्चिला जात आहे. बांगलादेशातील परिस्थिती बदलल्यानंतर भारतात घुसखोरी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. यातच मुंबईत बांगलादेशी घुसखोर महिलांनी थेट माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील कामाठीपुरातील एका महिलेने या योजनेचा लाभ घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ बांगलादेशींना अटक केली आहे. याप्रकरणी एका दलालालाही अटक केली आहे. या बांगलादेशी महिलेने भारतात घुसखोरी केली त्यानंतर बनावट कागदपत्रे बनविली आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. एजंटकडून बनावट कागदपत्रे बनवली होती. या एजंटलादेखील अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला पुण्यात अटक केली होती. आरोपी गेल्या २० वर्षांपासून भारतात राहत होता. त्याने बेकायदेशीरपणे भारत-बांगलादेश सीमा ओलांडली होती आणि कोलकातामध्ये जन्म प्रमाणपत्र बनवले होते. यानंतर तो अहमदाबाद आणि मुंबई मार्गे पुण्याला पोहोचला. मुंबई, ठाणे, पुणे आणि भिवंडी येथे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची प्रकरणे समोर आली आहे. या आरोपींकडे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशी कागदपत्रेही सापडली. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाState Governmentराज्य सरकारBangladeshबांगलादेशMumbaiमुंबईfraudधोकेबाजी