शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र पुणे

By admin | Updated: July 7, 2016 03:41 IST

एक सावत्र आई १६ वर्षांच्या मुलीला घेऊन थेट बांगलादेशामधून पुण्यात येते... अवघ्या २0 हजारांत तिचा सौदा करून दलालाच्या हाती सोपवून निघून जाते... बलात्कार आणि अत्याचार

पुणे : एक सावत्र आई १६ वर्षांच्या मुलीला घेऊन थेट बांगलादेशामधून पुण्यात येते... अवघ्या २0 हजारांत तिचा सौदा करून दलालाच्या हाती सोपवून निघून जाते... बलात्कार आणि अत्याचार सहन केलेल्या या युवतीची एका जागरूक नागरिकामुळे सुटका होते. ही घटना उघडकीस आली खरी; पण अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेली आहे. थेट बांगलादेशामधून पुण्यासारख्या शहरांमध्ये होणारी अवैध मानवी वाहतूक ही गंभीर बाब आहे. गरिबीमुळे ‘लैंगिक गुलामगिरी’ला बळी पडणाऱ्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी कीड पुण्यासारख्या शहरातही पाय पसरू लागली आहे. गेल्या तीन वर्षांत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत अनेक बांगलादेशी महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. प्रेमाचे नाटक करून, चांगल्या कामाच्या आमिषाने फसवून आणलेल्या महिलांचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. या तस्करीला जशी बांगलादेशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे, तशीच आपल्या देशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांची ‘अर्थपूर्ण’ डोळेझाकही कारणीभूत आहे. बांगलादेशात कमालीची आर्थिक हलाखी आहे. तेथे वेश्याव्यवसाय कायदेशीर करण्यात आलेला आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागामधून चोरटी मानवी वाहतूक केली जाते. भारतामध्ये कामगार, बांगलादेशी नागरिक, महिला, मुली, लहान मुले पाठवणे हा बांगलादेशातील एक मोठा व्यवसाय झाला आहे. सेक्स, गरिबी आणि ड्रग्ज ही बांगलादेशी समाजासमोरील एक मोठी समस्या आहे. गरिबीमुळे अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ओढले जात आहे. येथे लैंगिक गुलामगिरीच्या अनेक मुली बळी पडल्यात. महिलांचे जीवन उघड्यावर पडल्याचे चित्र आहे. तेथील वस्त्या नावाला असून, कुंटणखान्यांची बजबजपुरी बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये माजलेली आहे. दोन्ही देशांतील सीमावर्ती भागातील सुरक्षा यंत्रणा, पोलीस यांचे हात ओले केले की छुप्या पद्धतीने भारतात या सर्वांना प्रवेश मिळतो. अलीकडच्या काळात हे प्रमाण बरेच वाढले आहे. बांगलादेशामधून होत असलेल्या महिला आणि मुलींच्या तस्करीचा फटका केवळ तेथील सर्वसामान्यांनाच बसतो आहे असे नाही. तीन वर्षांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी केलेल्या कारवाईमध्ये चक्क बांगलादेशातील एका अतिमहत्त्वाच्या लष्करी अधिकाऱ्याच्या नातेवाईक असलेल्या दोन मुलींची सुटका केली होती. तब्बल : ३५० मुलींना भारतात विकल्याचे निष्पन्नबांगलादेशामधून या मुलींचे अपहरण करून त्यांना पुण्यामध्ये आणून विकण्यात आले होते. ही माहिती ‘रॉ’मार्फत पोलिसांना कळवली गेली. बर्गे आणि त्यांच्या पथकाने दिवसरात्र एक करीत एका मुलीचा शोध घेतला होता. या मुलीला बुधवार पेठेतील एका इमारतीवरील पाण्याच्या टाकीमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. तर तिच्या बहिणीला हडपसरजवळच्या एका बंगल्यामध्ये लपवून ठेवण्यात आले होते. या दोन्ही मुलींची सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवण्यात पोलिसांना यश आले होते. पोलिसांनी बेकायदा वेश्याव्यवसायाच्या कारवाईमध्ये अटक केलेल्या ‘राजू नेपाळी’ नावाच्या आरोपीने तर तब्बल साडेतीनशे मुलींना भारतात विकल्याचे सांगितले होते. बांगलादेशातील गरिबीमुळे तेथे रुपयाची किंमतही मोठी आहे. अवघ्या पाच ते दहा हजारांतसुद्धा महिलांची विक्री केली जात असल्याची उदाहरणे आहेत. सावत्र आईने तिच्या मुलीला २0 हजारांत विकले होते. तर बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्याच्या नातेवाईक मुलींनाही २0 हजारांतच विकण्यात आले होते. नाइलाजास्तव स्वेच्छेने या व्यवसायात आलेल्या महिलांची संख्याही तशी लक्षणीय आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.‘हाय प्रोफाइल’ वेश्याव्यवसायाचे प्रमाण वाढले... पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यागृहांमध्ये बांगलादेशी, नेपाळी आणि दक्षिण भारतीय महिलांचे प्रमाण मोठे आहे. या भागातील महिलांची संख्या घटत चालली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुण्यातील ‘हाय प्रोफाइल’ वेश्याव्यवसायाचे प्रमाण वाढले आहे. घरपोच सेवा देणे, मोबाईल कॉल, इंटरनेट आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधल्यास या महिला उपलब्ध करून देण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.अवैध मानवी वाहतुकींमध्ये लहान मुलांचे तसेच स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. लहान मुलांचा वापर बालमजुरी, अंधश्रद्धा तसेच अनैसर्गिक कृत्यांसाठी तर स्त्रियांचा वापर वेश्याव्यवसाय, अश्लील चित्रफीत बनविण्यासाठी, तसेच लग्नासाठी परराज्यात विक्रीसाठी करण्यात येत आहे. नेपाळ, बांगलादेश यांसारख्या सीमेवरील राज्यात ही मानवी अवैध वाहतूक आजही राजरोसपणे चालते. मानवी अवैध वाहतूक हा ज्वलंत सामाजिक प्रश्न असून, याबाबत समाजामध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.बांगलादेशामधून भारतात आल्यानंतर दलाल या महिलांना घेऊन कोलकात्यामध्ये येतात. येथून आझाद हिंद एक्स्प्रेसने पुण्यामध्ये या महिलांना आणले जाते. पुणे स्टेशनवर दलालांचे ‘डील’ होते. किरकोळ भावामध्ये अल्पवयीन मुलींपासून महिलांपर्यंत सर्वांची विक्री हे नित्याचे व्यवहार झाले आहेत. या एक्स्प्रेसवर लक्ष ठेवून पूर्वी कारवाई केली जात असे. मात्र अलिकडच्या काळात या कारवाया थंडावल्या आहेत.