शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

भरतीच्या वेळी केळी अन् ग्लुकोज

By admin | Updated: June 20, 2014 02:18 IST

पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

 यवतमाळ : पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता धावण्यापूर्वी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. भरतीसाठी खबरदारी म्हणून महासंचालकांनी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, यापुढील भरती या तत्त्वांनुसार करण्याचे आदेश आहेत.

बुधवारी रात्री पोलीस महासंचालक कार्यालयातून भरतीबाबतची ही मार्गदर्शक तत्त्वे बिनतारी संदेश यंत्रद्वारे जारी करण्यात आली. पोलीस भरतीत शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान पुरुषांसाठी 5 किलोमीटर तर महिलांसाठी 3 किलोमीटर रनिंग असते. या रनिंगपूर्वी प्रत्येक उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तो धावण्यासाठी सक्षम आहे अथवा नाही हे तपासले जाईल. सक्षम नसल्यास त्याला रनिंग करू देऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 वैद्यकीय तपासणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना रनिंगपूर्वी दोन केळी आणि ग्लुकोज पावडर देणो बंधनकारक करण्यात आले आहे. ही रनिंग कोणत्याही परिस्थितीत सकाळी 8 पूर्वी आणि सायंकाळी 4.3क् नंतर घ्यावी. शारीरिक क्षमता चाचणी सकाळी 8 ते सायंकाळी 4.3क् या वेळात घेतली जाऊ नये, असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहेत. 
या वर्षी रखरखत्या उन्हाळ्यात राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती घेण्यात आली. शारीरिक क्षमता चाचणीसह त्यांची लेखी परीक्षाही खुल्या मैदानात घेतली गेली. या भरतीत मुंबईमध्ये पाठोपाठ पाच उमेदवारांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभर खळबळ निर्माण झाली. हिवाळ्यामध्ये ही भरती घेणो अपेक्षित असताना उन्हाळ्यातच का घेतली गेली, म्हणून महासंचालक कार्यालयाला धारेवर धरले गेले. अन्य जिल्ह्यातसुद्धा अनेक उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान भोवळ येऊन पडल्याची उदाहरणो आहेत. काही ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी अद्यापही अधिक जागांमुळे प्रक्रिया सुरूच आहे. (प्रतिनिधी)