शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

राज्यात रासायनिक खतांवर बंदी घालणार : रामदास कदम यांचे सूतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 9:44 PM

महाराष्ट्रात यापुढे रासायनिक खतांवर बंदी घालण्यात येणार असून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर घेतलेला हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय असेल, असे सूतोवाच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्लास्टीक बंदी पाठोपाठ लवकरच आणखी एक धाडसी निर्णय घेणार

दापोली : महाराष्ट्रात यापुढे रासायनिक खतांवर बंदी घालण्यात येणार असून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर घेतलेला हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय असेल, असे सूतोवाच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत उंबरशेत येथील तळ्याचे नुतनीकरण व सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात २२७ नगरपालिका आणि २७ महानगरपालिका आहेत. त्यांच्या हद्दीत जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. तसेच गायी, म्हशी, गोठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकºयांकडून शेण विकत घेऊन त्या माध्यमातूनही सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे.

हे खत शेतकºयांना  ५० टक्के सवलतीत देण्यात येणार आहे, असे कदम म्हणाले.रासायनिक खते ही विषासमान आहेत. खतांच्या मात्रेने कर्करोगासारख्या दुर्धर व्याधी जडतात. माणसाचे आयुष्यही १५ ते २० वर्षांनी कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा विचार करून रासायनिक खते बंद करण्याबाबत विचार सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.

या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवरही टिका केली. कोकणावर सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने अन्याय केला. पश्चिम महाराष्ट्रात १९ टक्के सिंचन क्षमता असून कोकणामध्ये केवळ ती एक टक्के आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील सिंचनासाठी एक हजार कोटींचा निधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला. त्यावेळी कोकणावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगत आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मिळविला, असे ते म्हणाले. या वेळी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य योगेश कदम, विधानसभा संपर्क प्रमुख दादा गोवले, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे आदी उपस्थित होते.