शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बळीराजाची दिवाळी झाली गोड !

By admin | Updated: October 29, 2016 17:47 IST

सलगावात कष्टकरी, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम गेली 10 वर्षे येथील दत्ताजी पाटील प्रतिष्ठान करत आहे.

ऑनलाइन लोकमत 

लासलगाव (नाशिक) : प्रकाशपर्व  दिवाळीचा सण सर्वञ उत्साहानं साजरा होत आहे. कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात कष्टकरी, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम गेली 10 वर्षे येथील दत्ताजी पाटील प्रतिष्ठान करत आहे. 
 
खरिप हंगाम संपून रब्बी हंगामाची कामे ग्रामीण भागात सुरू आहे. लासलगाव पंचक्रोशीत खरिपाचा कांदा काढण्याचं काम काही ठिकाणी सुरू आहे तर काही ठिकाणी रब्बीची लागवड सुरू आहे. साहजिकच शेतकरी शेतीच्या कामात आहे. फराळ करायला महिलांना वेळ नसतो, अशावेळी दत्ताजी पाटील प्रतिष्ठानचा माफक दरातील व रुचकर फराळ शेतकरी, हमाल, मापारी, कामगार व कष्टकरी वर्ग घेताना दिसत आहे. साधारणपणे 70 रुपये किलो दरात चिवडा, मसाला शेव, भावनगरी शेव, शंकरपाळे, मका चिवडा,
 
करंजी,  चकली, मोतीपूर लाडू, सोनपापडी असे चवदार पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. 
गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षी 60 टन मालाची विक्री अवघ्या एका आठवड्यात झाली होती. यावर्षी चार दिवसांत शनिवारपर्यंत 40 टनाहून अधिक फराळ विक्री झालेली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी दिली. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी, समाधानी आहे. त्यामुळे मागील वर्षीचा विक्रीचा विक्रम यावर्षी मोडेल, अशी स्थिती आहे.            
 
           
 
कितीही गर्दी असली तरी योग्य नियोजनामुळे कोणताही गोंधळ येथे होत नाही. या उपक्रमात लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, मालवाहतूक चालक मालक संघटना व सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. बळीराजा, कष्टकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय आहे.