शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात बळीराजा पिचला

By admin | Updated: November 18, 2015 02:15 IST

सततच्या दुष्काळामुळे यंदा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या काळात तब्बल ९५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची

औरंगाबाद : सततच्या दुष्काळामुळे यंदा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या काळात तब्बल ९५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली आहे. मराठवाडा चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. चार वर्षांत खरीप हंगाम गेलाच, शिवाय दोन वर्षांपासून हिवाळ्यातील गारपिटीमुळे रबी हंगामही वाया गेला. कर्ज काढून पेरणीचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळत आहे. दुसरीकडे हाती आलेल्या धान्याला भाव मिळत नसल्याने, आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. २०१०पासून नोव्हेंबर २०१५पर्यंत विभागात २,२८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत १,५२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार १ जानेवारी २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील ५६५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने ५ कोटी ४४ लाख रुपयांची मदत केली. १९२ आत्महत्या शासनाने मदतीसाठी अपात्र ठरविल्या. १६७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)