शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

बाळासाहेबांची सेना सत्तेवरून पायउतार होऊ न देण्याची खेळी

By admin | Updated: January 29, 2017 00:49 IST

कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसवू द्यायचा नाही, याकरिता शिवसेना-मनसेच्या नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वाटाघाटी अचानक ‘मातोश्री’कडून थांबवण्यात आल्या आहेत.

- संदीप प्रधान, मुंबई

कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसवू द्यायचा नाही, याकरिता शिवसेना-मनसेच्या नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वाटाघाटी अचानक ‘मातोश्री’कडून थांबवण्यात आल्या आहेत. भाजपाला स्वबळावर चित करण्यात मनसेला वाटेकरी करून घेण्यास शिवसेनेतील काहींनी विरोध केला. मात्र, तरीही मनसेच्या केवळ जिंकून येऊ शकतील, अशाच जागांवर उमेदवार उभे करून शिवसेनेला अपशकुन न करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.भाजपासोबतची युती महापालिका निवडणुकीत तुटणार, हे दिसू लागल्यावर शिवसेनेतील काही मंडळींनी पुढाकार घेऊन मनसेसोबत समझोता करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांना केली. त्यांच्याच सूचनेवरून वाटाघाटी सुरू झाल्या. मनसे मुंबईत शिवसेनेला मदत करील आणि शिवसेना नाशिकमध्ये मनसेला हात देईल, असा प्रस्ताव पुढे आला. मात्र, चर्चेचे घोडे दादर-माहिम येथे येऊन अडले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत दादर-माहिमचा गड शिवसेनेने काबीज केला असला, तरी मागील महापालिका निवडणुकीत या परिसरात मनसेचे सात नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, येथेच वाटाघाटी बिनसल्या. त्यानंतर, मातोश्री पुन्हा ‘नॉट रिचेबल’ झाली. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने अचानक युती तोडल्यावर उद्धव-राज हे दूरध्वनीवर बोलले होते. त्यानंतर, दोन्ही बाजूंकडील नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा झाली होती. मात्र, अचानक ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांनी त्यामध्ये बिब्बा घातला. मनसे आपल्या उमेदवारांना ‘ए’ व ‘बी’ फॉर्म वाटायची थांबली असताना, तिकडे शिवसेनेने आपल्या उमेदवारांना फॉर्म वाटून टाकले. या वेळी पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.मात्र, आता राज यांनी आपल्या केवळ जिंकू शकतील, अशाच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसू नये आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सत्तेवरून पायउतार होऊ नये, याकरिता आपण हा निर्णय घेत असल्याची घोषणा राज करण्याची शक्यता आहे. या भूमिकेमुळे राज यांच्याबद्दल शिवसैनिकांत आस्था, प्रेम निर्माण होईल, अशी मनसेला खात्री वाटते.शिवसेनेतून विरोध का?गेली २५ वर्षे ज्याला मित्र म्हटले, तो भाजपा गिळायला सिद्ध झाला असताना, ज्या मनसेने २००६ पासून डोकेदुखी दिली, तो पक्ष जागा वाटपाचा समझोता करून पुन्हा जिवंत करायचा कशाला, असा एक प्रबळ मतप्रवाह शिवसेनेत असून, हे मत असणारी मंडळी उद्धव यांची अत्यंत निकटवर्तीय आहेत. स्वबळावर लढून भाजपाला पराभूत करणे शक्य असताना, त्या यशात वाटेकरी कशाला घ्यावा, असे शिवसेनेतील मनसे विरोधकांचे मत आहे.