शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Maharashtra Winter Session 2022: “पुढील १५ वर्ष मुंबईत आमचीच सत्ता, आता गुवाहाटीला जायची गरज नाही”: शहाजीबापू पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:56 IST

Gram Panchayat Election Result: ग्रामपंचायत निकालावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर ग्रामीण भागातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.

Gram Panchayat Election Result: राज्यातील ७,६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढविली गेली नसली तरी विजयानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे भाजपने क्रमांक एकच्या जागा पटकाविल्याचे चित्र आहे. यातच ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी आता आम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही, असे म्हटले आहे. 

शिंदे गटाला आता यापुढे महाराष्ट्रातून गुवाहटीला जावे लागणार नाही. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. पुढील १५ वर्ष तर मुंबईत आमचीच सत्ता राहणार असून, आता गुवाहटीला जाणार नाही, असे वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या निकालावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर ग्रामीण भागातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असेही पाटील यांनी नमूद केले. 

भाजप आणि शिंदे साहेबांची शिवसेना यांनाच जनतेचा कौल

शिवसेना चिन्हावर ही निवडणूक लढवली गेल्याचा आरोप होतोय. मात्र चिन्ह कोणतेही असले तरी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांनाच जनतेने कौल दिल्याचे शहाजी बापू पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, ते मत पूर्णपणे अमृता फडणवीस यांचे आहे. मी महात्मा गांधी यांनाच राष्ट्रपिता मानतो. तर एक महान नेता म्हणून नरेंद्र मोदी यांचा आदर करतो, असे शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, राज्यात निवडणूक लागलेल्या ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीपैकी भाजपने एकूण २ हजार ०२३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादी राँग्रेसने १ हजार २१५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. तर शिंदे गट ७७२, काँग्रेसने ८६१, ठाकरे गट ६३९ तर इतर पक्षांनी १ हजार १३५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन