शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान मोदी यांच्या मनोबल वाढवणाऱ्या उपक्रमांची चेष्टा करू नये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 18:15 IST

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरु आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेला संबोधित करताना पाच तारखेला देशभरातील नागरिकांना रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही यावर टीका केली आहे

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महालसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सामान्य लोकांबद्दल काही आपुलकी नसेल तर त्यांनी गप्प बसावे पण त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या उपक्रमाची कुचेष्टा करू नये व गंभीर संकटाच्या वेळी जनतेचे मनोबल खच्ची करू नये, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.  

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरु आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेला संबोधित करताना पाच तारखेला देशभरातील नागरिकांना रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही यावर टीका केली आहे. या टीकेला आता पाटील प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात काढलेल्या पत्रकात त्यांनी दिवे लावण्याच्या कृतीचे समर्थन करत थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. 

ते म्हणाले की, 'कोरोनाच्या विरुद्धचे युद्ध हे वेगळे युद्ध असून त्यामध्ये प्रत्येक नागरिक सैनिक आहे. संयम राखून देशाचे रक्षण करणाऱ्या नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पकतेने आणि गांभीर्याने रविवारी रात्री नऊ वाजता पारंपरिक दिवे लावण्याचे आवाहन केले असताना त्याला इव्हेंट समजणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाच प्रसंगाचे गांभीर्य नाही. देशाचा प्रमुख या नात्याने सैनिकांचे म्हणजेच सामान्य नागरिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी मा. पंतप्रधानांनी एक अत्यंत कल्पक आणि सर्वांना सहज करता येईल असा उपाय सांगितला. त्याचे स्वागत करून सामान्य लोकांना साथ देण्याच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या उपक्रमाला इव्हेंट म्हणतात म्हणजे त्यांना या संकटाचे गांभीर्य नाही आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या सामान्य लोकांची किंमत नाही हे स्पष्ट होते.  

पुढे ते म्हणाले की, 'सामान्य लोकांचा निर्धार ही या लढाईतील सर्वात महत्त्वाची बाब आहे. मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जनतेने संयम पाळून सोशल डिस्टन्सिंग करणे हाच कोरोनाच्या साथीवरील प्रभावी उपाय सध्या आहे. संपूर्ण समाज संयमाने व एकजुटीने या अनोख्या संकटाचा सामना करत आहे. देशाचा प्रमुख या नात्याने सैनिकांचे म्हणजेच सामान्य नागरिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी मा. पंतप्रधानांनी एक अत्यंत कल्पक आणि सर्वांना सहज करता येईल असा उपाय सांगितला. त्याचे स्वागत करून सामान्य लोकांना साथ देण्याच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या उपक्रमाला इव्हेंट म्हणतात म्हणजे त्यांना या संकटाचे गांभीर्य नाही आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या सामान्य लोकांची किंमत नाही हे स्पष्ट होते'. 

ते म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या संकटात सापडलेल्या गरीबांना चार घास मिळावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने तीन महिन्यांचे रेशनचे धान्य एकदम देण्यासाठी योजना जाहीर केली व त्यानुसार धान्य उपलब्ध केले. पण राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने गरीबांना मिळणारे मोफत धान्यही अटी घालून अडवून ठेवले आहे. विरोधासाठी विरोध करताना सर्वसामान्य जनतेला असे वेठीला धरणे योग्य नाही. पंतप्रधान म्हणून काय करावे याचे सल्ले देणाऱ्या थोरात यांनी आधी मोदीजींनी गरीबांसाठी पाठवलेले धान्य त्यांच्यापर्यंत पोहचेल याची सरकार म्हणून खबरदारी घ्यावी व नंतरच फुकटचे सल्ले द्यावेत'.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी