शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

बाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान मोदी यांच्या मनोबल वाढवणाऱ्या उपक्रमांची चेष्टा करू नये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 18:15 IST

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरु आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेला संबोधित करताना पाच तारखेला देशभरातील नागरिकांना रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही यावर टीका केली आहे

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महालसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सामान्य लोकांबद्दल काही आपुलकी नसेल तर त्यांनी गप्प बसावे पण त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या उपक्रमाची कुचेष्टा करू नये व गंभीर संकटाच्या वेळी जनतेचे मनोबल खच्ची करू नये, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.  

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरु आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेला संबोधित करताना पाच तारखेला देशभरातील नागरिकांना रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही यावर टीका केली आहे. या टीकेला आता पाटील प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात काढलेल्या पत्रकात त्यांनी दिवे लावण्याच्या कृतीचे समर्थन करत थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. 

ते म्हणाले की, 'कोरोनाच्या विरुद्धचे युद्ध हे वेगळे युद्ध असून त्यामध्ये प्रत्येक नागरिक सैनिक आहे. संयम राखून देशाचे रक्षण करणाऱ्या नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पकतेने आणि गांभीर्याने रविवारी रात्री नऊ वाजता पारंपरिक दिवे लावण्याचे आवाहन केले असताना त्याला इव्हेंट समजणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाच प्रसंगाचे गांभीर्य नाही. देशाचा प्रमुख या नात्याने सैनिकांचे म्हणजेच सामान्य नागरिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी मा. पंतप्रधानांनी एक अत्यंत कल्पक आणि सर्वांना सहज करता येईल असा उपाय सांगितला. त्याचे स्वागत करून सामान्य लोकांना साथ देण्याच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या उपक्रमाला इव्हेंट म्हणतात म्हणजे त्यांना या संकटाचे गांभीर्य नाही आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या सामान्य लोकांची किंमत नाही हे स्पष्ट होते.  

पुढे ते म्हणाले की, 'सामान्य लोकांचा निर्धार ही या लढाईतील सर्वात महत्त्वाची बाब आहे. मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जनतेने संयम पाळून सोशल डिस्टन्सिंग करणे हाच कोरोनाच्या साथीवरील प्रभावी उपाय सध्या आहे. संपूर्ण समाज संयमाने व एकजुटीने या अनोख्या संकटाचा सामना करत आहे. देशाचा प्रमुख या नात्याने सैनिकांचे म्हणजेच सामान्य नागरिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी मा. पंतप्रधानांनी एक अत्यंत कल्पक आणि सर्वांना सहज करता येईल असा उपाय सांगितला. त्याचे स्वागत करून सामान्य लोकांना साथ देण्याच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या उपक्रमाला इव्हेंट म्हणतात म्हणजे त्यांना या संकटाचे गांभीर्य नाही आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या सामान्य लोकांची किंमत नाही हे स्पष्ट होते'. 

ते म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या संकटात सापडलेल्या गरीबांना चार घास मिळावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने तीन महिन्यांचे रेशनचे धान्य एकदम देण्यासाठी योजना जाहीर केली व त्यानुसार धान्य उपलब्ध केले. पण राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने गरीबांना मिळणारे मोफत धान्यही अटी घालून अडवून ठेवले आहे. विरोधासाठी विरोध करताना सर्वसामान्य जनतेला असे वेठीला धरणे योग्य नाही. पंतप्रधान म्हणून काय करावे याचे सल्ले देणाऱ्या थोरात यांनी आधी मोदीजींनी गरीबांसाठी पाठवलेले धान्य त्यांच्यापर्यंत पोहचेल याची सरकार म्हणून खबरदारी घ्यावी व नंतरच फुकटचे सल्ले द्यावेत'.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी