शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

संजय दत्तप्रकरणी बाळासाहेबांनी दरडावले पण मुंड्यांनी तारले - उज्ज्वल निकम

By admin | Updated: June 3, 2015 16:47 IST

संजय दत्तला आपल्याला सोडवायचे आहे असे सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दरडावले, तर त्यास नकार देताच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी माझ्याकडून बाँबस्फोटाचा खटला काढून घेतला

ऑनलाइन लोकमत
संजय दत्तला आपल्याला सोडवायचे आहे असे सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दरडावले, तर त्यास नकार देताच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी माझ्याकडून बाँबस्फोटाचा खटला काढून घेतला, मात्र तत्कालिन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला तारले आणि आज जो काही मी आहे तो त्यांच्यामुळेच अशी श्रद्धांजली विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी मुंडेंना वाहिली आहे.
या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला आपल्याला सोडवायचे आहे, असे बाळासाहेबांनी अधिकाराने आपल्याला सांगितले व मुख्यमंत्र्यांना माझे वकिलपत्र काढण्याचा व पुन्हा जळगावला धाडण्याचा आदेश दिला असे सांगणा-या उज्ज्वल निकम यांनी अर्थात, त्यानंतर बाळासाहेबांनी कधी हस्तक्षेप केला नाही, उलट माझं कौतुक केलं व आमची गट्टी जमली अशी आठवणही सांगितली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त (३ जून) पुण्यातील चपराक या साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत निकम यांनी संजय दत्तला वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कसा दबाव टाकला, परंतु मुंडे यांनी बाळासाहेबांची समजूत काढली, खटला माझ्याकडून काढून घेतला नाही आणि पुन्हा जळगावला न धाडता, मुंबईतच ठेवून आपल्याला तारले, असे सांगत, आपल्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय मुंडे यांना दिले आहे.
संपूर्ण मुलाखत www.chaprak.com येथे वाचण्यास उपलब्ध आहे.