शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

राज्यातील बालगृहे कर्जाच्या विळख्यात!

By admin | Updated: January 26, 2015 04:57 IST

अनाथ-निराश्रित बालकांच्या परिपोषण करणा-या राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्था कर्जबाजाराच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. शासनाकडून त्यांना गेल्या दोन वर्षापासून एका रुपयांचीही मदत झालेली नाही

स्रेहा मोरे, मुंबईअनाथ-निराश्रित बालकांच्या परिपोषण करणा-या राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्था कर्जबाजाराच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. शासनाकडून त्यांना गेल्या दोन वर्षापासून एका रुपयांचीही मदत झालेली नाही. त्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बालगृहाच्या संस्थाचालक उधार-उसनवार करीत बालकांचे पालन-पोषण करावे लागत आहे. शासनाच्या तुटपुंज्या अनुदानावर चालणा-या अनाथ-निराश्रित बालकांच्या बालगृहांना दोन वर्षांपासून अनुदान नसल्याने ती चालविणाऱ्या स्वयंसेवी यंत्रणेला भीषण परिस्थितीशी झगडावे लागत आहे. राज्यातील नव्वद टक्के अनाथाश्रम ग्रामीण-आदिवासी भागात असल्याने त्या ठिकाणी दानशूर व्यक्तींची मदत दुरापास्त असल्याने अशा संस्थांना पूर्णपणे शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागते.शंभर बालके सांभाळणाऱ्या संस्थांचा वार्षिक खर्च जवळपास १२ ते १५ लाख रुपये होत असतांना संस्थांच्या हातात दरवर्षी पडतात अवघे तीन ते चार लाख रुपये. यातही वितरण करणाऱ्या यंत्रणेचे १० टक्के वजा जाता संबंधित चालकाच्या हाती उरलेल्या अनुदान रकमेतून किराणा, धान्य, कपडे, पांघरुण, घरभाडे, सेवकांचे मानधन आदी द्यायचे म्हटल्यावर घरातले दागिने मोडणे आणि स्थानिक व्यापारी-सावकार यांच्याकडून व्याजाने पैसे काढून ज्याची त्याची देणी देऊन कर्जाच्या हप्त्याचे आणि चक्रवाढ व्याजाचे भूत सध्या बालगृह चालकांच्या मानगुटीवर स्वार होऊन बसल्याने यातून सुटका करून घेण्याचा अंतिम पर्याय ही मंडळी शोधत आहे. कर्जाच्या विळख्यात गुरफटलेल्या संस्थाचालकांची यादी तशी खूप मोठी आहे. बालगृहावरील कर्जाचे डोंगर वाढत असल्याने संस्थाचालकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे, प्रलंबित अनुदानाचा प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे, असे मत राज्य बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष आर. के. जाधव यांनी मांडले.