शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

राज्यातील बालगृहे कर्जाच्या विळख्यात!

By admin | Updated: January 26, 2015 04:57 IST

अनाथ-निराश्रित बालकांच्या परिपोषण करणा-या राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्था कर्जबाजाराच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. शासनाकडून त्यांना गेल्या दोन वर्षापासून एका रुपयांचीही मदत झालेली नाही

स्रेहा मोरे, मुंबईअनाथ-निराश्रित बालकांच्या परिपोषण करणा-या राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्था कर्जबाजाराच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. शासनाकडून त्यांना गेल्या दोन वर्षापासून एका रुपयांचीही मदत झालेली नाही. त्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बालगृहाच्या संस्थाचालक उधार-उसनवार करीत बालकांचे पालन-पोषण करावे लागत आहे. शासनाच्या तुटपुंज्या अनुदानावर चालणा-या अनाथ-निराश्रित बालकांच्या बालगृहांना दोन वर्षांपासून अनुदान नसल्याने ती चालविणाऱ्या स्वयंसेवी यंत्रणेला भीषण परिस्थितीशी झगडावे लागत आहे. राज्यातील नव्वद टक्के अनाथाश्रम ग्रामीण-आदिवासी भागात असल्याने त्या ठिकाणी दानशूर व्यक्तींची मदत दुरापास्त असल्याने अशा संस्थांना पूर्णपणे शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागते.शंभर बालके सांभाळणाऱ्या संस्थांचा वार्षिक खर्च जवळपास १२ ते १५ लाख रुपये होत असतांना संस्थांच्या हातात दरवर्षी पडतात अवघे तीन ते चार लाख रुपये. यातही वितरण करणाऱ्या यंत्रणेचे १० टक्के वजा जाता संबंधित चालकाच्या हाती उरलेल्या अनुदान रकमेतून किराणा, धान्य, कपडे, पांघरुण, घरभाडे, सेवकांचे मानधन आदी द्यायचे म्हटल्यावर घरातले दागिने मोडणे आणि स्थानिक व्यापारी-सावकार यांच्याकडून व्याजाने पैसे काढून ज्याची त्याची देणी देऊन कर्जाच्या हप्त्याचे आणि चक्रवाढ व्याजाचे भूत सध्या बालगृह चालकांच्या मानगुटीवर स्वार होऊन बसल्याने यातून सुटका करून घेण्याचा अंतिम पर्याय ही मंडळी शोधत आहे. कर्जाच्या विळख्यात गुरफटलेल्या संस्थाचालकांची यादी तशी खूप मोठी आहे. बालगृहावरील कर्जाचे डोंगर वाढत असल्याने संस्थाचालकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे, प्रलंबित अनुदानाचा प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे, असे मत राज्य बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष आर. के. जाधव यांनी मांडले.