शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

बॅगिंग तंत्रज्ञानाने पिकला आंबा

By admin | Updated: April 6, 2017 17:01 IST

संकेत गोयथळे रत्नागिरी, दि. 6 - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० ...

संकेत गोयथळे

रत्नागिरी, दि. 6 - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० दिवसात पूर्णपणे कागदाच्या पिशवीत (बॅगिंग तंत्रज्ञानाने) आंबा पिकवला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यापर्यंत पोहोचली व जिल्हाधिकाऱ्यांनीही साधे परंतु प्रभावी तंत्रज्ञान अशा शब्दात झगडे यांचे कौतुक केले.नित्यानंद झगडे यांची असगोलीतील डोंगरात आंब्याची बाग आहे. सुमारे १५० ते २०० फूट उंच डोंगरात ते संपूर्ण कुटुंबासह आंब्याच्या बागेतच वास्तव्य करतात. शेतीतील वेगवेगळे प्रयोग करणारे तरुण शेतकरी अशी झगडे यांची ओळख आहे. उंच डोंगरात जलसंधारणासाठी बोअरिंग पुनर्भरणसह इतर प्रयोग करुन त्यांनी येथील पाणीपातळी वाढवली आहे. पूर्वी मार्चमध्ये पूर्णपणे कोरडी होणारी विहीर आज पाण्याने भरली आहे. या त्यांच्या प्रयोगाची तत्कालिन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनीही पाहणी केली होती. नित्यानंद झगडे यांनी दापोली कृषी विद्यापीठामध्ये आंबा पुनरुज्जीवन व बॅगिंग तंज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे झगडे हे गेली तीन वर्षे हा प्रयोग करत आहेत. यासाठी त्यांना गुहागर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त झालेल्या आंब्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे या फळाला नैसर्गिक आकर्षक रंग, मनमोहक सुगंध असून, कसलाही डाग किंवा ओरखडा फळावर नाही. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाने फळमाशीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळते. झगडे यांनी यावर्षी आंबा पिकासाठी कुठलीही रासायनिक खते व कीटकनाशके वापरलेली नाहीत. केवळ शेणखत, गांडूळखत, जिवामृत व गोमूत्र याचा वापर करुन दर्जेदार आंबापीक घेण्यात यश मिळवले आहे.प्रशासनाकडून दखलनित्यानंद झगडे यांनी बॅगिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आंबा पिकवला आहे. या तंत्रज्ञानाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. साधे परंतु प्रभावी तंत्रज्ञान अशा शब्दात त्यांनी या तंत्रज्ञानाची प्रशंसा केली आहे.

https://www.dailymotion.com/video/x844v2m