शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

बॅगिंग तंत्रज्ञानाने पिकला आंबा

By admin | Updated: April 6, 2017 17:01 IST

संकेत गोयथळे रत्नागिरी, दि. 6 - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० ...

संकेत गोयथळे

रत्नागिरी, दि. 6 - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० दिवसात पूर्णपणे कागदाच्या पिशवीत (बॅगिंग तंत्रज्ञानाने) आंबा पिकवला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यापर्यंत पोहोचली व जिल्हाधिकाऱ्यांनीही साधे परंतु प्रभावी तंत्रज्ञान अशा शब्दात झगडे यांचे कौतुक केले.नित्यानंद झगडे यांची असगोलीतील डोंगरात आंब्याची बाग आहे. सुमारे १५० ते २०० फूट उंच डोंगरात ते संपूर्ण कुटुंबासह आंब्याच्या बागेतच वास्तव्य करतात. शेतीतील वेगवेगळे प्रयोग करणारे तरुण शेतकरी अशी झगडे यांची ओळख आहे. उंच डोंगरात जलसंधारणासाठी बोअरिंग पुनर्भरणसह इतर प्रयोग करुन त्यांनी येथील पाणीपातळी वाढवली आहे. पूर्वी मार्चमध्ये पूर्णपणे कोरडी होणारी विहीर आज पाण्याने भरली आहे. या त्यांच्या प्रयोगाची तत्कालिन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनीही पाहणी केली होती. नित्यानंद झगडे यांनी दापोली कृषी विद्यापीठामध्ये आंबा पुनरुज्जीवन व बॅगिंग तंज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे झगडे हे गेली तीन वर्षे हा प्रयोग करत आहेत. यासाठी त्यांना गुहागर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त झालेल्या आंब्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे या फळाला नैसर्गिक आकर्षक रंग, मनमोहक सुगंध असून, कसलाही डाग किंवा ओरखडा फळावर नाही. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाने फळमाशीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळते. झगडे यांनी यावर्षी आंबा पिकासाठी कुठलीही रासायनिक खते व कीटकनाशके वापरलेली नाहीत. केवळ शेणखत, गांडूळखत, जिवामृत व गोमूत्र याचा वापर करुन दर्जेदार आंबापीक घेण्यात यश मिळवले आहे.प्रशासनाकडून दखलनित्यानंद झगडे यांनी बॅगिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आंबा पिकवला आहे. या तंत्रज्ञानाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. साधे परंतु प्रभावी तंत्रज्ञान अशा शब्दात त्यांनी या तंत्रज्ञानाची प्रशंसा केली आहे.

https://www.dailymotion.com/video/x844v2m