शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली अहिंसा क्षेत्र करणार

By admin | Updated: February 4, 2015 00:04 IST

देवेंद्र फडणवीस : जगाला जैन तत्त्वज्ञानाची गरज; अहिंसा व विश्वशांतीचा संदेश देणारा महामस्तकाभिषेक सोहळा

भरत शास्त्री --बाहुबली --१००८ भगवान बाहुबलींनी अहिंसा, सत्य, त्याग व तपश्चर्येचा संदेश जगातील प्राणिमात्रांना दिला होता. देशाच्या विकासासाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक उन्नतीसाठी जैन तत्त्वज्ञानाची गरज भासत आहे. या तत्त्वज्ञानाची बिजे बाहुबली आश्रम आणि विद्यापीठात रुजवली जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. हा सोहळा अहिंसा व विश्वशांतीचा संदेश देणारा महामहोत्सव आहे. बाहुबली परिसर अहिंसा क्षेत्र घोषित करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.बाहुबली (ता. हातकणंगले) येथे १००८ भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सहकारमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, सदाभाऊ खोत, समंतभद्र मंचावर १०८ वर्धमान सागरजी महाराज, क्षुल्लक समर्पणसागर महाराज, आर्यिका ज्ञानमती माताजी संघ व लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, बाहुबली संस्थेने संस्कारक्षम पिढी निर्माण केली आहे. १९३४ पासून या संस्थेने ज्ञानदानाचे काम अव्याहतपणे केले आहे. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या संस्कारामुळेच संपूर्ण महामस्तकाभिषेकातील अन्नदानाचा खर्च माजी विद्यार्थी करीत आहेत, ही बाब स्फुरणीय आहे. या भागातील लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी बाहुबली तीर्थक्षेत्राची संपूर्ण माहिती दिली. क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने बाहुबली व परिसरातील पाणीपुरवठा योजना, गुरुकुल वसतिगृहाची अद्ययावत इमारत, गुरुकुलातील मुलांसाठी भोजनगृह व परिसराला अहिंसाक्षेत्र घोषित करावे, आदी मागण्या त्यांनी केल्या.शेट्टी म्हणाले, बाहुबलीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा. देशभरातून लाखो भाविक येथे येतात. त्यामुळे या क्षेत्रास आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली. वीर सेवा दलाचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, सावकार मादनाईक, महामस्तकाभिषेक सोहळ्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद दोशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, वाशिमचे आमदार राजेंद्र पटणी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डी. सी. पाटील, हातकणंगलेचे सभापती राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, बाबासाहेब पाटील, बापूसाहेब पाटील, डी. ए. पाटील, धनराज बाकलीवाल, भगवान काटे, अरुण पाटील, सनतकुमार आरवाडे, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांच्यासह भाविक उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणा...बाहुबली परिसरातील गावांना आवश्यक पाणीपुरवठा योजना, वसतिगृह, गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी भोजनगृह, बहुउद्देशीय सभागृह आदी मागण्या पूर्ण करण्याची ग्वाहीशिवाजी विद्यापीठामधील महावीर अध्यासन केंद्रासाठी निधीची त्वरित पूर्तता करणारबाहुबली परिसराला अहिंसा क्षेत्र घोषित करण्याबाबत आदेश काढणारउपस्थितांची मने जिंकलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामस्तकाभिषेक सोहळ्यात भाषणाची सुरुवात दिगंबर मुनी व त्यागींना उद्देशून ‘नमोस्तू’ व श्रावक-श्राविकांना उद्देशून ‘जय जिनेंद्र’ म्हणून केली, तर भाषणाचा शेवट पुन्हा ‘जय जिनेंद्र’ म्हणून केला आणि उपस्थितांची मने जिंकली.‘णमोकार’ मंत्राच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महामस्तकाभिषेकबाहुबली : श्री १००८ भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक समारंभाच्या दुसऱ्या दिवशीचा अभिषेक णमोकार मंत्राच्या जयघोषात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.भगवान बाहुबली मूर्ती सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पटणी (वाशिम), माजी मंत्री प्रकाश आवाडे, क्षुल्लकरत्न समर्पणसागर महाराज यांनी बाहुबली महामूर्तीवर मंगल कलशाभिषेक केला.दुसऱ्या दिवशीचा भगवान बाहुबली मूर्ती चरणाभिषेक यजमान रवींद्र भरमू बेडगे, पुष्पा रवींद्र बेडगे यांच्या हस्ते झाला. प्रतिष्ठाचार्य पंडित सुशीलकुमार उपाध्ये, पं. महावीर शास्त्री, पंडित सम्मेद उपाध्ये यांनी मंत्रोच्चार विधीसह श्रुतस्कंध विधान केले. विधानमंडप ध्वजारोहण मुलचंद लुहाडिया यांनी केले. विधानमंडप उद्घाटन घीसूलालजी बाकलीवाल यांनी केले. मंगल कलशस्थापना उत्तमराव आवाडे, सपना आवाडे यांच्या हस्ते झाले. भरतेश सांगरुळकर यांनी दीपप्रज्वलन केले. दुसऱ्या महामस्तकाभिषेक सोहळ्यातील जलाभिषेक यजमान रवींद्र बेडगे, यज्ञनायक प्रकाश नाईक यांच्या हस्ते झाला. दुग्धाभिषेक अजित छाबडा (जालना), आर. पी. पाटील (कुंभोज), वनौषधी अभिषेक प्रमोद लडगे (मुंबई), अष्टगंधाभिषेक तात्यासोा सिदनाळे (दत्तवाड) यांच्याहस्ते विविध १५ प्रकारच्या रसांनी भगवान बाहुबली महामूर्तीवर मस्तकाभिषेक झाला. सायंकाळी रवींद्र जैन (मुंबई) यांचा संगीत सरगम कार्यक्रम झाला. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, महावीर शंकर गाठ, अरविंद दोशी, बाबासाहेब पाटील, धनराज बाकलीवाल, बी. टी. बेडगे, कार्याध्यक्ष डी. सी. पाटील, तात्यासो अथणे, प्रकाश पाटील, अनिल भोकरे, कलगोंडा पाटील आदी उपस्थित होते.