शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाला साकडे

By admin | Updated: April 13, 2017 00:37 IST

मराठा समाजाचा मागासवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध संस्थांच्या वतीने साकडे घालण्यात आले. त्याचबरोबर रामगढीया शीख

नाशिक : मराठा समाजाचा मागासवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध संस्थांच्या वतीने साकडे घालण्यात आले. त्याचबरोबर रामगढीया शीख आणि लाडशाखीय वाणी सामजासह इतर समाजांनी आयोगाकडे आरक्षणाच्या मागण्या केल्या आहेत. अल्पसंख्याकांमध्ये पटवेगर यांचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे.राज्य मागासवर्ग आयोगाने येथील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात १३ जातींच्या प्रलंबित मागण्यांवर सुनावणी घेतली. तेराही जातींकडून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या जातींचा मागासवर्गात समावेश करण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडे मागणी केली होती. या मागणीवर राज्य मागासवर्ग आयोगाचे सचिव दिनेश सास्तुरकर यांच्या ४ सदस्यीय सदस्यांनी या १३ जातींच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून उपस्थित जातींच्या आरक्षणाविषयीच्या मागणीवर सुनावणी घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाने घडशी, कन्सारा, पटवेगर, बैरागी, चेवले गवळी, दाभोळी गवळी, शाहू वेली, नावाडी, राठोड, वळुंजु वाणी, लाडशाखीय वाणी, लाडवंजारी, रामगर्दिया सिख, कानडे/ कानडी आदी जातींना बुधवारी त्यांच्या जातींचा मागासवर्गात समावेश करण्याच्या मागणीवर सुनावणी घेतली.गासे- वनमाळी माळी जातीसंबंधी शासकीय स्तरावरील चुकीत दुरुस्ती करून गासे व वनमाळी या जातींचे विभक्तीकरण क रून दोन्ही जातींना स्वतंत्र करण्याची मागणी यावेळी पी. एम. पघड यांनी केली. तर पटवे महोम्मद यांनी अत्तार या जातीची तत्सम जात पटवे, पटवेगीर, पाटोकर या जातींचा समावेश करण्यासाठी आयोगाला निवेदन दिले. महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्थेतर्फे भटक्या जमाती-ब मधील सर्वप्रकारच्या मुस्लीम धर्मीय जाती वगळून त्यांचा अल्पसंख्याक वर्गात समावेश करण्याची मागणी केली. बैरागी जातीच्या संदर्भात अखिल भारतीय वैष्ण बैरागी परिषदेने शपथपत्र सादर करण्यासाठी आयोगाकडे वेळ मागून घेतला आहे. पदाधिकाऱ्यांनी आयोगाची भेट घेऊन समस्या आयोगासमोर मांडल्या. (प्रतिनिधी)आरक्षणाची गरज : मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या अप्रगत आहे. हा समाज एकूण सर्व समाजव्यवस्थेचा राज्य व्यवस्थेचा कणा आहे. मात्र या समाजाची अवस्था आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अडचणीची झाली आहे. या समाजाला अन्य समाजाच्या बरोबरीने आणायचे असेल तर अन्य समाज व मराठा समाजात निर्माण झालेली दरी दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘मनविसे’ने निवेदनात नमूद केले आहे.