शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाला साकडे

By admin | Updated: April 13, 2017 00:37 IST

मराठा समाजाचा मागासवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध संस्थांच्या वतीने साकडे घालण्यात आले. त्याचबरोबर रामगढीया शीख

नाशिक : मराठा समाजाचा मागासवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध संस्थांच्या वतीने साकडे घालण्यात आले. त्याचबरोबर रामगढीया शीख आणि लाडशाखीय वाणी सामजासह इतर समाजांनी आयोगाकडे आरक्षणाच्या मागण्या केल्या आहेत. अल्पसंख्याकांमध्ये पटवेगर यांचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे.राज्य मागासवर्ग आयोगाने येथील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात १३ जातींच्या प्रलंबित मागण्यांवर सुनावणी घेतली. तेराही जातींकडून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या जातींचा मागासवर्गात समावेश करण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडे मागणी केली होती. या मागणीवर राज्य मागासवर्ग आयोगाचे सचिव दिनेश सास्तुरकर यांच्या ४ सदस्यीय सदस्यांनी या १३ जातींच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून उपस्थित जातींच्या आरक्षणाविषयीच्या मागणीवर सुनावणी घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाने घडशी, कन्सारा, पटवेगर, बैरागी, चेवले गवळी, दाभोळी गवळी, शाहू वेली, नावाडी, राठोड, वळुंजु वाणी, लाडशाखीय वाणी, लाडवंजारी, रामगर्दिया सिख, कानडे/ कानडी आदी जातींना बुधवारी त्यांच्या जातींचा मागासवर्गात समावेश करण्याच्या मागणीवर सुनावणी घेतली.गासे- वनमाळी माळी जातीसंबंधी शासकीय स्तरावरील चुकीत दुरुस्ती करून गासे व वनमाळी या जातींचे विभक्तीकरण क रून दोन्ही जातींना स्वतंत्र करण्याची मागणी यावेळी पी. एम. पघड यांनी केली. तर पटवे महोम्मद यांनी अत्तार या जातीची तत्सम जात पटवे, पटवेगीर, पाटोकर या जातींचा समावेश करण्यासाठी आयोगाला निवेदन दिले. महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्थेतर्फे भटक्या जमाती-ब मधील सर्वप्रकारच्या मुस्लीम धर्मीय जाती वगळून त्यांचा अल्पसंख्याक वर्गात समावेश करण्याची मागणी केली. बैरागी जातीच्या संदर्भात अखिल भारतीय वैष्ण बैरागी परिषदेने शपथपत्र सादर करण्यासाठी आयोगाकडे वेळ मागून घेतला आहे. पदाधिकाऱ्यांनी आयोगाची भेट घेऊन समस्या आयोगासमोर मांडल्या. (प्रतिनिधी)आरक्षणाची गरज : मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या अप्रगत आहे. हा समाज एकूण सर्व समाजव्यवस्थेचा राज्य व्यवस्थेचा कणा आहे. मात्र या समाजाची अवस्था आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अडचणीची झाली आहे. या समाजाला अन्य समाजाच्या बरोबरीने आणायचे असेल तर अन्य समाज व मराठा समाजात निर्माण झालेली दरी दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘मनविसे’ने निवेदनात नमूद केले आहे.