शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

संघभूमीत लागले आझादीचे नारे

By admin | Updated: August 14, 2016 23:01 IST

अखंड भारत दिवसाचे निमित्त साधून संघस्थानावर संघ स्वयंसेवकांनी आझादीचा सूर पकडत दहशतवाद व फुटीरवाद्यांविरोधात नारे लावले

ऑनलाइन लोकमतनागपूर,  दि. 14 - पाकव्याप्त काश्मीर, कन्हैय्या कुमार प्रकरणात देशाविरोधात आझादीचे नारे लागल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखंड भारत दिवसाचे निमित्त साधून संघस्थानावर संघ स्वयंसेवकांनी आझादीचा सूर पकडत दहशतवाद व फुटीरवाद्यांविरोधात नारे लावले. संघ स्मृतिमंदिर परिसरात देश मांगे आतंकवाद से आझादी, देश मांगे अलगाववाद से आझादी असे नारे स्वयंसेवकांनी लावले.यावेळी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी काश्मिर मुद्द्यावरुन पाकिस्तान तसेच फुटीरवाद्यांवर टीका केली. गेल्या काही काळापासून भारतातच राहून आपल्याच देशाविरुद्ध गरळ ओकणारे दिसून येत आहेत. ज्यांना भारत जिंदाबाद वाटत नाही त्यांनी देश सोडावा, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. पाकिस्तानने जर भारताला आव्हान दिले तर त्यांचे अस्तित्वच संकटात येऊ शकते. . देशातील प्रत्येक इंच जमीन महत्त्वाची आहे व पाकव्याप्त काश्मीर एक दिवस नक्कीच देशात परत येईलच. परंतु भारतापासून वेगळे करण्यात आलेले इतर देशदेखील भारताचे नेतृत्व मान्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी इंद्रेशकुमार यांनी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.स्वातंत्र्यलढ्यात संघ स्वयंसेवकांचा मौलिक सहभागसंघाने स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान दिले नाही अशी टीका होते. परंतु १९४७ अगोदर कॉंग्रेस हा पक्ष नव्हता तर ती स्वातंत्र्यचळवळ होती. मीठ, जंगल सत्याग्रहात स्वयंसेवक सहभागी होती. शिवाय क्रातिकाऱ्यांना स्वयंसेवक मदत करायचे. फाळणीनंतर निर्वासितांसाठी स्वयंसेवकच धावले होते. तिरंग्याचा संघाने नेहमीच सन्मान केला आहे. परंतु जे संघावर आरोप करतात त्यांनी स्वत:च्या कपड्यांवरील डाग पहावे, असे इंद्रेश कुमार म्हणाले