शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

संघभूमीत लागले आझादीचे नारे

By admin | Updated: August 14, 2016 23:01 IST

अखंड भारत दिवसाचे निमित्त साधून संघस्थानावर संघ स्वयंसेवकांनी आझादीचा सूर पकडत दहशतवाद व फुटीरवाद्यांविरोधात नारे लावले

ऑनलाइन लोकमतनागपूर,  दि. 14 - पाकव्याप्त काश्मीर, कन्हैय्या कुमार प्रकरणात देशाविरोधात आझादीचे नारे लागल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखंड भारत दिवसाचे निमित्त साधून संघस्थानावर संघ स्वयंसेवकांनी आझादीचा सूर पकडत दहशतवाद व फुटीरवाद्यांविरोधात नारे लावले. संघ स्मृतिमंदिर परिसरात देश मांगे आतंकवाद से आझादी, देश मांगे अलगाववाद से आझादी असे नारे स्वयंसेवकांनी लावले.यावेळी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी काश्मिर मुद्द्यावरुन पाकिस्तान तसेच फुटीरवाद्यांवर टीका केली. गेल्या काही काळापासून भारतातच राहून आपल्याच देशाविरुद्ध गरळ ओकणारे दिसून येत आहेत. ज्यांना भारत जिंदाबाद वाटत नाही त्यांनी देश सोडावा, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. पाकिस्तानने जर भारताला आव्हान दिले तर त्यांचे अस्तित्वच संकटात येऊ शकते. . देशातील प्रत्येक इंच जमीन महत्त्वाची आहे व पाकव्याप्त काश्मीर एक दिवस नक्कीच देशात परत येईलच. परंतु भारतापासून वेगळे करण्यात आलेले इतर देशदेखील भारताचे नेतृत्व मान्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी इंद्रेशकुमार यांनी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.स्वातंत्र्यलढ्यात संघ स्वयंसेवकांचा मौलिक सहभागसंघाने स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान दिले नाही अशी टीका होते. परंतु १९४७ अगोदर कॉंग्रेस हा पक्ष नव्हता तर ती स्वातंत्र्यचळवळ होती. मीठ, जंगल सत्याग्रहात स्वयंसेवक सहभागी होती. शिवाय क्रातिकाऱ्यांना स्वयंसेवक मदत करायचे. फाळणीनंतर निर्वासितांसाठी स्वयंसेवकच धावले होते. तिरंग्याचा संघाने नेहमीच सन्मान केला आहे. परंतु जे संघावर आरोप करतात त्यांनी स्वत:च्या कपड्यांवरील डाग पहावे, असे इंद्रेश कुमार म्हणाले