शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संघभूमीत लागले आझादीचे नारे

By admin | Updated: August 14, 2016 23:01 IST

अखंड भारत दिवसाचे निमित्त साधून संघस्थानावर संघ स्वयंसेवकांनी आझादीचा सूर पकडत दहशतवाद व फुटीरवाद्यांविरोधात नारे लावले

ऑनलाइन लोकमतनागपूर,  दि. 14 - पाकव्याप्त काश्मीर, कन्हैय्या कुमार प्रकरणात देशाविरोधात आझादीचे नारे लागल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखंड भारत दिवसाचे निमित्त साधून संघस्थानावर संघ स्वयंसेवकांनी आझादीचा सूर पकडत दहशतवाद व फुटीरवाद्यांविरोधात नारे लावले. संघ स्मृतिमंदिर परिसरात देश मांगे आतंकवाद से आझादी, देश मांगे अलगाववाद से आझादी असे नारे स्वयंसेवकांनी लावले.यावेळी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी काश्मिर मुद्द्यावरुन पाकिस्तान तसेच फुटीरवाद्यांवर टीका केली. गेल्या काही काळापासून भारतातच राहून आपल्याच देशाविरुद्ध गरळ ओकणारे दिसून येत आहेत. ज्यांना भारत जिंदाबाद वाटत नाही त्यांनी देश सोडावा, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. पाकिस्तानने जर भारताला आव्हान दिले तर त्यांचे अस्तित्वच संकटात येऊ शकते. . देशातील प्रत्येक इंच जमीन महत्त्वाची आहे व पाकव्याप्त काश्मीर एक दिवस नक्कीच देशात परत येईलच. परंतु भारतापासून वेगळे करण्यात आलेले इतर देशदेखील भारताचे नेतृत्व मान्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी इंद्रेशकुमार यांनी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.स्वातंत्र्यलढ्यात संघ स्वयंसेवकांचा मौलिक सहभागसंघाने स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान दिले नाही अशी टीका होते. परंतु १९४७ अगोदर कॉंग्रेस हा पक्ष नव्हता तर ती स्वातंत्र्यचळवळ होती. मीठ, जंगल सत्याग्रहात स्वयंसेवक सहभागी होती. शिवाय क्रातिकाऱ्यांना स्वयंसेवक मदत करायचे. फाळणीनंतर निर्वासितांसाठी स्वयंसेवकच धावले होते. तिरंग्याचा संघाने नेहमीच सन्मान केला आहे. परंतु जे संघावर आरोप करतात त्यांनी स्वत:च्या कपड्यांवरील डाग पहावे, असे इंद्रेश कुमार म्हणाले