शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएच्या विरोधामुळे आयुर्वेद-युनानी डॉक्टर्स संकटात

By admin | Updated: September 13, 2014 00:42 IST

शासनाच्या निर्णयास न्यायालयात आव्हान; आयुर्वेद-युनानी पदवीधरांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह.

बुलडाणा : आयुर्वेद व युनानी पदवीधारकांना अँलोपॅथी उपचार पध्दतीचे अधिकार देणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयास इंडियन मेडीकल असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान देऊन, हा कायदाच रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी काम करणार्‍या आयुर्वेद व युनानी पदवीधारकांवर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. राज्यातील आयुर्वेद व युनानी पदवीधारकांना अँलोपॅथी चिकीत्सा पध्दती वापरण्याचा अधिकार १९९२ व १९९९ च्या परिपत्रकानुसार प्राप्त झाला होता. २६ जून २0१४ रोजी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा अधिनियमातील कलमामध्ये रितसर सुधारणा करून, तसा कायदाही करण्यात आला होता; मात्र गत आठ ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने महाराष्ट्र शासन, सीसीआयएम, एमसीआयएम यांच्याविरोधात याचिका दाखल करून, परिपत्रक व सुधारित कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ८ ऑक्टोबर ही तारीख निश्‍चित केली होती; मात्र आयएमएने याप्रकरणाचे गांभिर्य विशद केल्याने १ सप्टेंबरलाच सुनावणी पार पाडण्यात आली. हा निर्णय आयएमएच्या बाजुने लागल्यास त्याचा सर्वाधिक फटका आयुर्वेद पदविधारकांच्या निमा संघटनेला बसू शकतो. त्यामुळे या विषयावर आपली बाजु मांडण्यासाठी निमाने स्वत:हून न्यायालयात धाव घेतली आहे. दुर्गम भाग, आदिवासी, वाड्या, वस्त्या, नक्षलग्रस्त तसेच कुपोषणग्रस्त भागात आयुर्वेद व युनानी पदवीधर अल्प मोबदल्यामध्ये सेवा देतात. याउलट अँलोपॅथीचे डॉक्टर ग्रामीण भागात किंवा शासकीय नोकरी करण्यास अनुत्सुक असतात. परिणामी आरोग्य सेवेवर ताण येतो. या उद्देशाने शासनाने या पदवीधारकांना अँलोपॅथी प्रॅक्टीसची परवानगी दिली होती. त्यामुळे शासनाच्या आरोग्य सेवेवरील ताणही कमी झाला होता. आता इंडियन मेडीकल असोसिएशनने विरोधाची भूमिका घेतल्यामुळे आयुर्वेद-युनानी पदवीधारकांचे भवितव्य संकटात सापडण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्वांसाठी आरोग्य या शासनाच्या उपक्रमालाही खीळ बसणार आहे. राज्यात सुमारे ८0 हजार आयुर्वेद पदवीधारक व २0 हजारावर युनानी पदवीधारक आहेत. त्यांच्यासाठी निमा संघटनेने कायदेशीर लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.