शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

पुढील वर्षापासून ई-बुक, ब्लॉग लेखन करणा-यांनाही पुरस्कार : विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:47 IST

शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाºयांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.

मुंबई : शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाºयांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी मराठी भाषा गौरव दिनी विविध साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी विनोद तावडे बोलत होते. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह आमदार गणपतराव देशमुख, भाई गिरकर, आशिष देशमुख उपस्थित होते.यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना, श्री पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशन यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात आला. राम नाईक यांना राज्य शासनाच्या वतीने ‘लक्ष्मीबाई टिळक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १८ दर्जेदार पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध साहित्य प्रकारांतील ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले. राहुल कोसंबी, ल.म. कडू, सुजाता देशमुख आणि श्रीकांत देशमुख या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांचाही सन्मान करण्यात आला.व्यापक प्रमाणात साजरा करणार-भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार येथे तयार करण्यात आले असून आगामी काळात हे गाव प्रकाशक, लेखकांसाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. येत्या काळात पुस्तकांच्या गावी विविध साहित्यिकांचे महोत्सव आयोजित करून मराठी भाषा दिन अधिक व्यापक प्रमाणात साजरा करू. पहिली ते दहावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात मराठी सक्तीचे करण्याच्या सूचना अभ्यासक्रम मंडळाला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. - विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्रीमी मराठीत लिहिलेल्या ‘चरैवैती चरैवैती’ या पुस्तकाचा सहा भाषांमध्ये अनुवाद होत आहे. २६ मार्च रोजी संस्कृत भाषेतील अनुवादित पुस्तकाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. ‘चरैवैती-चरैवैती’ या शब्दाचा अर्थ ‘चालत राहा, चालत राहा’ असा असून याप्रमाणे मी माझा लेखन प्रवास सुरू ठेवला आहे. - राम नाईक, राज्यपाल, उत्तर प्रदेश

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे