शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

लेखकांच्या ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरुच!

By admin | Updated: October 15, 2015 02:32 IST

देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला

मुंबई : देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला.लोकशाहीर संभाजी भगत, उर्मिला पवार, मुकुंद कुळे आणि लेखक इब्राहिम अफगाण यांनी सरकारकडे पुरस्कार परत पाठवले.साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी मंगळवारी सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यापाठोपाठ इब्राहिम अफगाण यांनी साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार आणि कुळे यांनी राज्य शासनाचे दोन पुरस्कार परत केले आहेत. तर सरकारवर असहिष्णुतेचा ठपका ठेवत लोकशाहीर संभाजी भगत यांनी ‘नागरिक’ चित्रपटासाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार परत करण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी यशवंत चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे.साहित्य अकादमीने २०१३ साली शायर निदा फाजली यांच्या ‘दिवारों के बीच’ या उर्दूतील आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या ‘हाक’ या मराठी अनुवादासाठी इब्राहिम अफगाण यांना पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार परत करत असल्याचे अफगाण यांनी जाहीर केले. देशातील असहिष्णू वातावरणाविरुद्ध कलाकार आणि लेखकांनी एकत्र आले पाहिजे, असेही ते म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर होत असलेली अभिव्यक्ती, स्वातंत्र्याची गळचेपी, विचारवंताच्या हत्या आणि एकूणच इतिहासाची प्रतिगामी मांडणी या पार्श्वभूमीवर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून निषेध व्यक्त करत पुरस्कार परत केल्याची भावना मुकुंद कुळे यांनी व्यक्त केली. पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर संघाची टीकानागपूर : पुरोगामी विचारवंतांची हत्या व दादरी येथील घटना तसेच देशातील वाढती असहिष्णुता यांचा निषेध व्यक्त करीत पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका करून मोदी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. साहित्यिक जाणूनबुजून असे पाऊल उचलत असून साहित्याच्या आडचे हे राजकारण असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे. या साहित्यिकांनी देशासोबतच साहित्यप्रेमींचा अपमान केला असल्याचे संघाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. बांगलादेशच्या साहित्यिक तस्लीमा नसरीन यांचे शीर आणून देणाऱ्याला बक्षिसाची घोषणा करण्यात आली, गोधरामध्ये निरपराध कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले, यावेळी हे साहित्यिक कुठे गेले होते, असा प्रश्न संघाकडून करण्यात आला आहे.