शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

लेखकांच्या ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरुच!

By admin | Updated: October 15, 2015 02:32 IST

देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला

मुंबई : देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला.लोकशाहीर संभाजी भगत, उर्मिला पवार, मुकुंद कुळे आणि लेखक इब्राहिम अफगाण यांनी सरकारकडे पुरस्कार परत पाठवले.साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी मंगळवारी सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यापाठोपाठ इब्राहिम अफगाण यांनी साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार आणि कुळे यांनी राज्य शासनाचे दोन पुरस्कार परत केले आहेत. तर सरकारवर असहिष्णुतेचा ठपका ठेवत लोकशाहीर संभाजी भगत यांनी ‘नागरिक’ चित्रपटासाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार परत करण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी यशवंत चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे.साहित्य अकादमीने २०१३ साली शायर निदा फाजली यांच्या ‘दिवारों के बीच’ या उर्दूतील आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या ‘हाक’ या मराठी अनुवादासाठी इब्राहिम अफगाण यांना पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार परत करत असल्याचे अफगाण यांनी जाहीर केले. देशातील असहिष्णू वातावरणाविरुद्ध कलाकार आणि लेखकांनी एकत्र आले पाहिजे, असेही ते म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर होत असलेली अभिव्यक्ती, स्वातंत्र्याची गळचेपी, विचारवंताच्या हत्या आणि एकूणच इतिहासाची प्रतिगामी मांडणी या पार्श्वभूमीवर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून निषेध व्यक्त करत पुरस्कार परत केल्याची भावना मुकुंद कुळे यांनी व्यक्त केली. पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर संघाची टीकानागपूर : पुरोगामी विचारवंतांची हत्या व दादरी येथील घटना तसेच देशातील वाढती असहिष्णुता यांचा निषेध व्यक्त करीत पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका करून मोदी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. साहित्यिक जाणूनबुजून असे पाऊल उचलत असून साहित्याच्या आडचे हे राजकारण असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे. या साहित्यिकांनी देशासोबतच साहित्यप्रेमींचा अपमान केला असल्याचे संघाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. बांगलादेशच्या साहित्यिक तस्लीमा नसरीन यांचे शीर आणून देणाऱ्याला बक्षिसाची घोषणा करण्यात आली, गोधरामध्ये निरपराध कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले, यावेळी हे साहित्यिक कुठे गेले होते, असा प्रश्न संघाकडून करण्यात आला आहे.