शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

लेखकांच्या ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरुच!

By admin | Updated: October 15, 2015 02:32 IST

देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला

मुंबई : देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला.लोकशाहीर संभाजी भगत, उर्मिला पवार, मुकुंद कुळे आणि लेखक इब्राहिम अफगाण यांनी सरकारकडे पुरस्कार परत पाठवले.साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी मंगळवारी सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यापाठोपाठ इब्राहिम अफगाण यांनी साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार आणि कुळे यांनी राज्य शासनाचे दोन पुरस्कार परत केले आहेत. तर सरकारवर असहिष्णुतेचा ठपका ठेवत लोकशाहीर संभाजी भगत यांनी ‘नागरिक’ चित्रपटासाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार परत करण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी यशवंत चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे.साहित्य अकादमीने २०१३ साली शायर निदा फाजली यांच्या ‘दिवारों के बीच’ या उर्दूतील आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या ‘हाक’ या मराठी अनुवादासाठी इब्राहिम अफगाण यांना पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार परत करत असल्याचे अफगाण यांनी जाहीर केले. देशातील असहिष्णू वातावरणाविरुद्ध कलाकार आणि लेखकांनी एकत्र आले पाहिजे, असेही ते म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर होत असलेली अभिव्यक्ती, स्वातंत्र्याची गळचेपी, विचारवंताच्या हत्या आणि एकूणच इतिहासाची प्रतिगामी मांडणी या पार्श्वभूमीवर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून निषेध व्यक्त करत पुरस्कार परत केल्याची भावना मुकुंद कुळे यांनी व्यक्त केली. पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर संघाची टीकानागपूर : पुरोगामी विचारवंतांची हत्या व दादरी येथील घटना तसेच देशातील वाढती असहिष्णुता यांचा निषेध व्यक्त करीत पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका करून मोदी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. साहित्यिक जाणूनबुजून असे पाऊल उचलत असून साहित्याच्या आडचे हे राजकारण असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे. या साहित्यिकांनी देशासोबतच साहित्यप्रेमींचा अपमान केला असल्याचे संघाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. बांगलादेशच्या साहित्यिक तस्लीमा नसरीन यांचे शीर आणून देणाऱ्याला बक्षिसाची घोषणा करण्यात आली, गोधरामध्ये निरपराध कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले, यावेळी हे साहित्यिक कुठे गेले होते, असा प्रश्न संघाकडून करण्यात आला आहे.