शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

औरंगाबादेत विधानसभेलाही मुलभूत प्रश्न ऐरणीवर; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 15:20 IST

आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत माउली संवाद हा महिलांसाठींचा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, या माउली संवादमध्ये महिलांनी पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांवरून अर्थात, पाणी, कचरा आणि रस्ते यावरून शिवसेना नेत्यांना धारेवर धरल्याचे समोर आले आहे.

मुंबई - राज्यात निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची प्रत्येकवेळी गाजतात ते औरंगाबादमधील मुलभूत प्रश्नच. लोकसभा निवडणुकीच्या वेळी औरंगाबादधील कचरा प्रश्न चांगलाच गाजला होता. किंबहुना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना याच समस्येमुळे धक्का बसला आहे. त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांमध्ये पाणी, कचरा, रस्ते हेच प्रश्न गाजले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील हेच प्रश्न शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत चंद्रकांत खैरे सतत 15 वर्षे खासदार होते. तर महानगर पालिकेत देखील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी येथील कचरा प्रश्नाने भीषण रूप धारण केले होते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजन न केल्यामुळे शहरभर कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता.

औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याची समस्या देखील भीषण झाली आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जिल्ह्यात असूनही जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होते. त्यामुळे मोठी नाराजी आहे. तर रस्त्यांच्या बाबतीतही लोकांना त्रास सहन करावा लागला होता. या समस्यांना डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादकरांनी जिल्ह्यात लोकसभेला परिवर्तन केले. आता देखील तेच प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहेत.

विविध पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. त्यात शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत माउली संवाद हा महिलांसाठींचा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, या माउली संवादमध्ये महिलांनी पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांवरून अर्थात, पाणी, कचरा आणि रस्ते यावरून शिवसेना नेत्यांना धारेवर धरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विधानसभेला देखील पुन्हा एकदा मुलभूत प्रश्न गाजण्याची शक्यता असून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपसाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.