शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

राष्ट्रीय सणांना हजेरी सक्तीची

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

लक्षणीय अनुपस्थिती : राष्ट्रीय सणाचे गांभीर्य नाही

सागर पाटील - टेंभ्ये  -राज्यात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. संपूर्ण राज्यभर हे सण अत्यंत उत्साहात साजरे होतात. परंतु शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील या दिवसांची उपस्थिती मात्र चिंतनीय होत आहे. या राष्ट्रीय सणाच्या दिवशी कार्यालयात असणाऱ्या अनुपस्थितीचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी हजेरी पत्रकावर सही सक्तीची मानली जात नाही. त्यामुळे अनेकजणांना हा दिवस म्हणजे सुटीचा दिवस वाटतो. नुकताच ६८वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. परंतु या दिनाला अपवादात्मक स्थितीमध्येच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. बहुतांश शासकीय कार्यालयांत अधिकारी व मोजकेच कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत होते. हा दिवस ‘नॉन इन्स्ट्रक्शनल डे’ मानला जातो. त्यामुळे कार्यालयातील हजेरी पत्रकावर सही घेतली जात नाही. यावेळचा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आल्याने अनेकजणांनी शनिवारची रजा टाकून जोडून येणाऱ्या सोमवारच्या पतेतीच्या सुटीचा लाभ घेतला. एक रजा टाकून सलग चार दिवस सुटी मिळत असल्याने अनेकांनी वर्षा सहलीचे आयोजन करून पर्यटनाचा आनंद लुटला. त्यामुळे या कालावधीत पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या गर्दीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत होते. राष्ट्रीय सणांमधून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या मुल्यांची रुजवणूक केली जाते. अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. याची जाणीव सर्वांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी स्वातंत्र्य दिनाला उपस्थिती आवश्यक आहे. या दिवसांचे रुपांतर सुटीच्या दिवसामध्ये झाल्यास त्यांचे महत्त्व नामशेष होईल. यामुळे भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या महत्त्वाच्या मुल्यांची रुजवणूक करणे अशक्य होईल. राष्ट्रीय सणांचे महत्व टिकून राहावे, यासाठी या दिवसाला कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करणे आवश्यक आहे. काही कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाला अन्य ठिकाणी उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे केले जाते. यामुळे संबंधित कर्मचारी ध्वजारोहणाला उपस्थित होता, हे निश्चित होते. एकंदरीत राष्ट्रीय सणांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करण्यासाठी या हजेरीपत्रकांवर सही घेणे आवश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.  

विशेष प्रयत्न सुरू झालेत  -शिक्षक १०० टक्के उपस्थित! राष्ट्रीय सणांना उपस्थित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण पाहिल्यास यामध्ये सर्व स्तरावरील शिक्षक १०० टक्के उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळते. शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचारीदेखील १०० टक्के उपस्थित असतात. शाळांमधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या महत्त्वाच्या मुल्यांचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी अनुपस्थित राहून वर्षा सहलीचा आनंद लुटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी.  सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करणे अनिवार्य.