शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 06:13 IST

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ७ डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाहीत हे जवळपास स्पष्ट असताना आता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ७ डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाहीत हे जवळपास स्पष्ट असताना आता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.राणे उमदेवार नसतील तर शिवसेनेचा पाठिंबा भाजपाच्या उमेदवाराला मिळविण्यात मुख्यमंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले की भाजपाचा विजय ही केवळ औपचारिकता असेल. कारण, भाजपाचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ मिळून १८५ आमदार होतात. २८८ सदस्यांपैकी १८५ मते भाजपाला मिळणार असतील तर ७ डिसेंबरच्या निवडणुकीआधीच भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेले असेल.अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून उमेदवार देतील का हा प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी विधान परिषदेची प्रत्येक निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना यशही आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनेलाही विश्वासात घेतले होते. निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी आपण हा पुढाकार घेतल्याचे चव्हाण यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्याच धर्तीवर, यावेळी भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून यावा, असा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.भाजपाकडून सध्या तीन नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले प्रसाद लाड, भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि शायना एनसी यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल, असे म्हटले जाते. लाड यांना संधी देऊन भंडारी वा शायना एनसी यांना डावलल्यास निष्ठावानाऐवजी उपºयांना संधी दिल्याची टीका होऊ शकते. तथापि,निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लाड यांच्या नावाला अन्य पक्षांकडून सहमती मिळू शकते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे