शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरुच

By admin | Updated: February 27, 2016 04:51 IST

लातूरच्या पानगाव येथे एका पोलिसाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच राज्यात पोलिसांवर हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. ठाणे येथे एका महिला वाहतूक पोलिसाला शिवसेनेच्या

मुंबई : लातूरच्या पानगाव येथे एका पोलिसाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच राज्यात पोलिसांवर हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. ठाणे येथे एका महिला वाहतूक पोलिसाला शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने मारहाण करून विनयभंग केला. मुंबईच्या कांदिवली परिसरात दोन पोलिसांना दोघांनी तर नाशिक येथे एका पोलिसाला तिघा दुचाकीस्वारांनी धक्काबुक्की केली.महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करून विनयभंग करणारा धर्मवीर नगर येथील शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे याची रवानगी शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या घटनेचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर, हा पक्षाचा पदाधिकारीच नाही, असे सांगत शिवसेनेने हात झटकण्याचा प्रयत्नही केला आहे. नितीन कंपनी सिग्नल येथे गुरुवारी सकाळी महिला हवालदार वाहतुकीचे नियमन करीत होती. त्याच वेळी तीनहात नाका बाजूकडून स्कॉर्पिओतून कालगुडे आला. तो मोबाइलवर बोलत गाडी चालवत असल्याचे निदर्शनास येताच त्याला थांबण्याचा इशारा महिला हवालदाराने केला. गाडी थांबताच त्यांनी लायसन्सची मागणी केली. तेव्हा शिवीगाळ करून ‘कशाला पाहिजे लायसन्स’, असा प्रतिसवाल करून कालगुडे गाडी पुढे नेऊ लागला. तरीही, महिला हवालदाराने गाडीमागे धावून त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यावर, चिडलेल्या कालगुडेने गाडी थांबवून महिला हवालदाराला मारहाण केली. याप्रकरणी दुपारी कालगुडे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी नोकरावर हल्ला, विनयभंग, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आदी कलमांखाली नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. हा प्रकार करणारा पक्षाचा पदाधिकारी नाही, असे टष्ट्वीट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे.कालगुडे याच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी दुपारीच संपली. मात्र लागलीच नौपाडा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी विक्रांत पाटील यांनी त्याच्यावर ११० नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. नौपाडा पोलिसांनी त्याची गाडीही जप्त केली आहे. (प्रतिनिधी)पोलिसांना सुरक्षा देण्याची वेळखाकी वर्दीवरील वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांनाच सुरक्षा कवच देण्याची वेळ ओढवली आहे. २०१४मध्ये १९७ पोलिसांच्या वर्दीवर हात टाकल्याप्रकरणी २४३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्या तुलनेत २०१५मध्ये ६४ गुन्ह्यांची भर पडली आहे. गेल्या वर्षी २०१५मध्ये पोलिसांवरील हल्ल्याचे २०१ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले. यापैकी अवघ्या १८८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती.कांदिवलीमध्ये दोन पोलिसांना मारहाणकांदिवलीच्या महावीर नगर परिसरात शुक्रवारी पहाटे ३च्या सुमारास गस्तीवरील कांदिवली पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रशांत साळुंखे व त्यांच्या व्हॅन चालकाला दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. एका मोटारीने साळुंखे यांच्या व्हॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साळुंखे यांनी त्या मोटारीतील दोघांना हटकले. त्याचा रागाने त्या दोघांनी शिवीगाळ करीत तेथून पळ काढला. साळुंखे यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यातच चालकाचा ताबा सुटल्याने ती मोटार रस्त्याकडील एका कठड्याला धडकली. पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, मोटारीतील दोघांनी साळुंखे आणि व्हॅन चालक पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणी नीरज शर्मा (३२) आणि सुनील शर्मा (३१) यांना अटक करण्यात आली आहे.