शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन; सरकारविरोधात माहोल तयार करा- शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:09 IST

कुठलीही वातावरण निर्मिती आपोआप होत नाही. विद्यमान सरकारच्या विरोधात माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विविध जाती, धर्मांच्या लोकांमध्ये विस्तार करण्याची गरज आहे.

वर्धा : कुठलीही वातावरण निर्मिती आपोआप होत नाही. विद्यमान सरकारच्या विरोधात माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विविध जाती, धर्मांच्या लोकांमध्ये विस्तार करण्याची गरज आहे. सर्व जाती धर्माचे लोक पक्षाशी जुळले तर यश हे निश्चितपणे पदरात पडेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.वर्धा येथे पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले की, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर इंदिराजींनी वर्धा जिल्ह्यातील पवनार भूमीतून पक्ष बांधणीला सुरूवात केली. वर्धेची भूमी ही विनोबा व गांधी यांच्यामुळे पावन झाली आहे. त्यामुळे येथूनच विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.विद्यमान सरकारने चावडीवर कर्जमाफीच्या याद्यांचे वाचन करून शेतकºयांचा स्वाभिमान रस्त्यावर आणला आहे. त्यामुळे विदर्भात आत्महत्या वाढल्यात.आतापर्यंत ६९० शेतकºयांनी मागील तीन महिन्यांत आत्महत्या केल्या. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने ‘कुठे नेऊन ठेवला रेमहाराष्ट्र माझा’, अशी विचारणा सत्ताधारी पक्षाकडे केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, हे विचारण्याची वेळ आली आहे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार