शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

ठाण्यात ‘एटीएस’चे स्वतंत्र युनिट

By admin | Updated: October 31, 2016 06:54 IST

संशयास्पद व्यक्तींच्या वाढत्या वावराच्या शक्यतेमुळे, राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी आता या भागातील सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता बाळगण्याचा निर्णय घेतला

जमीर काझी,

मुंबई- मुंबईबरोबरच ठाणे व कोकण किनारपट्टीच्या गावात अतिरेकी, संशयास्पद व्यक्तींच्या वाढत्या वावराच्या शक्यतेमुळे, राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी आता या भागातील सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मंजूर मनुष्यबळातून स्वतंत्र युनिट कार्यरत केले जाणार आहे. दोन पोलीस निरीक्षकांसह ३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या ठिकाणी नेमला जाणार आहे. सहा महिन्यांपूर्वी एटीएसने पाठविलेल्या या प्रस्तावाला गृहविभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे आता स्थानिक ठाणे आयुक्तालय व ग्रामीण भागातील पोलिसांवर पडणारा ताण कमी होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबरोबरच ठाणे व कोकणाला मोठी सागरी किनारपट्टी लाभली आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी परप्रांतीय, बाहेरच्या मंडळींचा वावर वाढल्याने, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालये, कोकण परिक्षेत्र परिमंडळांतर्गत रायगड, ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यात दहशतवादी संघटनांचे हस्तक, दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालणे, देशविघातक कृत्यांना लगाम घालण्यासाठी एटीएसचे एक पथक सात वर्षांपासून कार्यरत आहे. या कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे ठाणे आयुक्तालय व ठाणे ग्रामीण अधीक्षक यांच्याकडील उपलब्ध मनुष्यबळापासून तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत होते. मात्र, या भागातील अतिरेकी संघटनांचा वाढता वावर पाहता, एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ठाण्यात एटीएसच्या मुख्यालयात मंजूर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची काही पदे त्या ठिकाणी स्थलांतरित करून, स्वतंत्र युनिट सुरू करण्याचा प्रस्ताव २३ मार्चला तयारकेला होता. पोलीस महासंचालकांकडून २४ मे रोजी तो गृहविभागाकडे पाठविण्यात आला. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. आता या ठिकाणी स्थानिक पोलिसांऐवजी एटीएसकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.>सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवरगेल्या महिन्यात उरण येथे पाच अतिरेकी घुसल्याच्या अफवेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती, तर तीन दिवसांपूर्वी पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत. त्यामुळे या भागातील सुरक्षेबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे एटीएसचे स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.३८ कर्मचाऱ्यांचा ताफाठाण्यातील एटीएस युनिटसाठी दोन निरीक्षक, ४ सहायक निरीक्षक, ६ उपनिरीक्षक,४ एएसआय व हवालदार आणि २२ नाईक व कॉन्स्टेबल असे एकूण ३८ अधिकारी-कर्मचारी पूर्ण वेळ कार्यरत राहतील, त्यांच्यावर सहायक आयुक्त, उपायुक्त, तसेच मुंबई एटीएस मुख्यालयातून विशेष महानिरीक्षक यांचे नियंत्रण असेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.ही ठिकाणे संवेदनशीलठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, पडघा, कल्याण आदी ठिकाणी परप्रांतीयांचा वावर वाढला आहे. त्यामुळे ही संवेदनशील ठिकाणे बनलेली आहेत. त्यामुळे या भागात व सागरी किनाऱ्यावर अतिरेकी संघटनांचे हस्तक, त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून, राज्य पोलीस व एटीएसला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.