शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 29, 2014 12:33 IST

केंद्रातील मंत्रीपदाच्या गुळाच्या आशेने भीमशक्तीला अंधारात ठेवून रामदास आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ -  केंद्रातील मंत्रीपदाच्या गुळाच्या आशेने भीमशक्तीला अंधारात ठेवून रामदास आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली असतानाही भाजपात गेलेल्या रामदास आठवले यांचा 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. आठवल्यांच्या हातात चणे-फुटाणे म्हणून विधानसभेच्या सात-आठ जागा ठेवण्यात आल्या असल्या तरी केंद्रातील मंत्रीपदाचा गूळ हेच सौदा यशस्वी होण्याचे मुख्य कारण आहे. मात्र आठवले भाजपाच्या तंबूत घुसले असले तरीही आंबेडकरी जनता महाराष्ट्रहितासाठी शिवशक्तीबरोबरच राहणार असल्याचे सांगत उद्धव यांनी सर्व जनता आपल्यासोबतच असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 
जे लोक आज आठवल्यांच्या पायाशी कमळपाकळ्यांचे सडे पाडत आहेत तेच लोक आठवल्यांना पाहून दरवाजे धाडकन बंद करून घेत होते. आठवले व त्यांची भीमशक्ती हे शिवसेनेचे लोढणे आहे. आम्ही का गळ्यात बांधायचे?’’ या राजकीय हेतूने समस्त भाजप परिवार आठवल्यांचे तोंड दिसताच रस्ताच बदलत होते ना? असा सवालही लेखात करण्यात आला आहे. अशा गोंधळी नेतृत्वामुळेच आंबेडकर महाराष्ट्रात जन्मास येऊनही त्यांच्या विचारांची वाट लागली असे टीकास्त्रही लेखात सोडण्यात आले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात:
 
- नवा सौदा असा झालेला दिसतो की, आठवले यांना केंद्रात मंत्रीपदाचा चोथा दिला जाईल व भाजपची सत्ता आलीच तर सत्तेत १० टक्के वाटा दिला जाईल! बाकी विधानसभेच्या ७-८ जागा चणे-फुटाणे म्हणून त्यांच्या हाती ठेवल्या असल्या तरी केंद्रातील मंत्रीपदाचा गूळ हेच सौदा यशस्वी होण्याचे मुख्य कारण आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हणे हा गूळ लावला व आठवले यांनी भीमशक्तीला अंधारात ठेवून आंबेडकरी जनतेला दगा दिला.
 
- "माझे मंत्रीपद प्यारे. त्यासाठी मी काहीही करीन. मंत्रीपद नसेल तर जनतेची सेवा कशी करू?’’ असा प्रबळ विचार पुन्हा एकदा रामदास आठवल्यांनी दिला, पण हा दिव्य विचार त्यांच्या समर्थकांना तरी मान्य आहे काय? मुळात शिवशक्तीबरोबर भीमशक्ती यावी व महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडावी हा मूळ विचार शिवसेनाप्रमुखांचा. महाराष्ट्राची फक्त दोनच दैवते - एक छत्रपती शिवराय व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा विचार बाळासाहेबांचा! ‘‘तुमचे धर्मांतर झाले असेल, पण रक्तांतर झालेले नाही. आपण सारे एक आहोत. आपले रक्त एक आहे. एकत्र येऊ आणि राज्याची सत्ता ताब्यात घेऊ’’ ही गर्जना बाळासाहेबांची. 
 
- आठवल्यांना मंत्रीपद देऊन भीमशक्तीचा मान राखावा असे भाजपातील एकाही पुढार्‍याला वाटले नाही. उलट ‘‘राज्यसभा दिली तेच मोठे, आठवले व त्यांची भीमशक्ती हे शिवसेनेचे लोढणे आहे. आम्ही का गळ्यात बांधायचे?’’ या उदात्त राजकीय हेतूने समस्त भाजप परिवार आठवल्यांचे तोंड दिसताच रस्ताच बदलत होते ना? 
 
- मुळात आठवल्यांना राज्यसभा देण्यासाठी त्यांची इतकी खळखळ होती की विचारता सोय नाही, पण आम्हीच तेव्हा आठवले यांच्यासाठी अहमदाबाद येथे मोदींना व दिल्लीत राजनाथ सिंह यांना जाऊन भेटलो व मोदी यांना पंतप्रधान व्हायचे असेल तर महाराष्ट्रातील भीमशक्तीस बळ देणे गरजेचे आहे व आठवले यांना राज्यसभा देण्याची गरज असल्याचे निक्षून सांगितले.
 
- आज जे लोक आठवल्यांच्या पायाशी कमळपाकळ्यांचे सडे पाडत आहेत तेच लोक आठवल्यांना पाहून दरवाजे धाडकन बंद करून घेत होते, पण काळाचा महिमा अगाध आहे. आठवले आज त्यांच्याच दारात बसून मंत्रीपदाचे सौदे करतात. आंबेडकर महाराष्ट्रात जन्मास येऊनही त्यांच्या विचारांची वाट लागली ती अशाच गोंधळी नेतृत्वामुळे. 
 
-  हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा आहे तसा तो बाळासाहेबांचा व बाबासाहेबांचा आहे. असा महाराष्ट्र घडविण्याची संधी आठवले यांनी गमावली त्याबद्दल दु:ख व्यक्त करावे की दिल्लीश्‍वरांनी मंत्रीपदाचे गाजर दाखवून तंबूत घेतले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे? तूर्तास आम्ही आठवलेंना शुभेच्छा देतो व भीमशक्ती आजही शिवशक्तीबरोबर राहिल्याबद्दल त्या विराट निळ्या सागराचे अभिनंदन करतो