शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

फलज्योतिष ही आयात केलेली अंधश्रद्धा

By admin | Updated: January 14, 2015 00:47 IST

नामवंत वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांनी ज्योतिषशास्त्राच्या मूळ संकल्पनेवरच जोरदार प्रहार केला आहे. ग्रहताऱ्यांच्या दशा, फेरे या बाबी भारतीय प्राचीन ग्रंथांत कुठेच आढळत नाही. फलज्योतिष ही

जयंत नारळीकर : प्राचीन दाखले तपासण्याची आवश्यकतानागपूर : नामवंत वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांनी ज्योतिषशास्त्राच्या मूळ संकल्पनेवरच जोरदार प्रहार केला आहे. ग्रहताऱ्यांच्या दशा, फेरे या बाबी भारतीय प्राचीन ग्रंथांत कुठेच आढळत नाही. फलज्योतिष ही आयात केलेली अंधश्रद्धा आहे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी ते उपराजधानीत आले होते. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला व विविध मुद्यांवर त्यांचे विचार जाणून घेतले.आपल्या देशात फलज्योतिषावर मोठ्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तींचा प्रगाढ विश्वास असल्याचे दिसून येते. परंतु खरोखर शास्त्रीय कारणातून हे शास्त्र विकसित झाले आहे का याचे दाखले तपासण्याची आवश्यकता आहे. वेदांमध्ये तसेच प्राचीन ग्रंथांतून फलज्योतिष मिळालेले नाही तर ते ग्रीक संस्कृतीतून आपल्याकडे आले. या आयात केलेल्या गोष्टीला आपण नवीन स्वरूपात जगासमोर आणले. तार्किक व शास्त्रीय दृष्टीने त्यातील विज्ञान तपासण्याऐवजी अंधश्रद्धेच्या रूपातच याचा जास्त प्रसार झाला. बाहेरील देशांमध्ये फलज्योतिषावर फारसा विश्वास ठेवला जात नाही असे डॉ.नारळीकर म्हणाले.शैक्षणिक प्रणालीत बदलांची गरज आज देशात मूळ विज्ञानाकडे विद्यार्थ्यांना वळविण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने त्याचे प्रमाण कमी आहे. ‘पॅकेज’च्या शर्यतीत संशोधनवृत्ती मागे पडते आहे. हे चांगले चिन्ह नाही. आधुनिकीकरणाच्या काळात देशाच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. विशेषत: विज्ञान, गणित हे विषय शिकविण्याच्या वेगळ्या व आकर्षक पद्धतींची अंमलबजावणी करायला हवी. पाठांतर काही बाबींमध्ये ठीक आहे, परंतु प्रत्येकच ठिकाणी पाठांतरावर भर देणे अयोग्य आहे. ‘बेसिक’ शिकविण्याकडे कल असला पाहिजे असा सल्ला डॉ.नारळीकर यांनी दिला.(प्रतिनिधी)वैज्ञानिकांनो, ‘इगो’ बाळगू नका!आपल्या देशातील वैज्ञानिक लालफीतशाहीमध्ये अडकत चालले आहेत. जर योग्य दिशेने जायचे असेल तर त्यांनी ‘इगो’ न बाळगता सर्वांसाठी चर्चेची दारे उघडी ठेवली पाहिजे असे परखड मत नारळीकर यांनी व्यक्त केले. वैज्ञानिकांमध्ये असलेल्या ‘इगो’मुळे सामान्य विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचून मार्गदर्शन घेऊ शकत नाही. मोकळेपणाने चर्चा करणे तर दूरच राहिले. जर विज्ञानाचा प्रसार करायचा असेल तर मनात कुठल्याही प्रकारची अढी असता कामा नये असे नारळीकर म्हणाले.