शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Assembly Elections Results 2019: दानवेंनी मदत करूनही खोतकरांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 22:26 IST

लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचे काम केले.

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात चांगलीच गट्टी जमली होती. लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून दानवे देखील खोतकरांसाठी जालन्यात विधानसभा निवडणुकीत ताकद लावताना पाहायला मिळाले होते. मात्र दानवेंची मदत मिळूनही खोतकरां ना आपला गड कायम राखता आला नाही.

जालना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल २५३४८ मतांनी पराभूत केले आहे. खोतकर यांच्याकडे राज्यमंत्री पद असल्याने आणि ग्रामीण भागात वाढता संपर्क असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, मागच्या पराभवाने खचून न जाता गोरंट्याल यांनी मतदारसंघाची बांधणी केली. तसेच त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याने जालना शहरातील व्यापारी वर्ग त्यांच्याकडे वळला. त्यामुळे याचा फटका खोतकर यांना बसल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोतकर आणि दानवे यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले होते. त्यावेळी दानवे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत दोघांची समेट घडवून आणली. त्यानंतर खोतकर यांनी दानवेंसाठी जालना जिल्हा पिंजून काढला आणि दानवेंचा सहज विजय झाला.

लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचे काम केले. त्यांच्या प्रचारार्थ विविध सभा आणि बैठका सुद्धा घेतल्या. मात्र एवढे करूनही खोतकर यांना विजय मिळवता आला नाही. तर त्यांचा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी २५३४८ मतांनी पराभूत केले. अर्जून खोतकर यांना ६६४९७ मते मिळाली तर कैलास गोरंट्याल यांना निर्णायक ९१८३५ मते मिळाली आहे.