शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पिण्याचे पाणी वापरल्याप्रकरणी विचारला जाब

By admin | Updated: March 22, 2016 01:56 IST

महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या बांधकामासाठी महापालिका प्रशासनाकडूनच पिण्याचे पाणी वापरण्यात आल्याप्रकरणी नगरसेवकांनी मुख्य सभेत प्रशासनाला जाब विचारला

पुणे : महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या बांधकामासाठी महापालिका प्रशासनाकडूनच पिण्याचे पाणी वापरण्यात आल्याप्रकरणी नगरसेवकांनी मुख्य सभेत प्रशासनाला जाब विचारला. त्यावर स्पष्टीकरण देताना महापालिका प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. एकीकडे प्रशासनाकडून पाण्याची नासाडी केली जात असल्याने प्रभागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळू शकत नसल्याची टीका सोमवारी नगरसेवकांनी केली.महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आला. या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत सोमवारी याचे पडसाद उमटले. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीसाठी २ कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत मांडण्यात आला होता. त्या वेळी मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांनी वर्गीकरणाला विरोध नाही; मात्र त्याच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केली. प्रभागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या सातत्याने तक्रारी येत असताना अशी पाणीटंचाई योग्य नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.विस्तारीत इमारतीसाठी खोदकाम करताना पाण्याचे झरे लागले असून, त्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुम्ही बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरले असल्याचे पुरावे सादर करू असे सांगताच प्रशासनाकडून सावरासावर करण्यात आली.> बकेट खरेदीत अनियमिततामहापालिकेकडून २०१५-१६ या वर्षासाठी साडेसात लिटरच्या बकेटची खरेदी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने सात लिटर क्षमतेचीच बकेट पुरविली असल्याचा आरोप नगरसेवक धनंजय जाधव यांनी केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी न करता ते स्वीकारले कसे, याची विचारणा त्यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. > शहरातील ५०० गोठ्यांचे होणार स्थलांतरशहरातील गोठे स्थलांतरित करण्यासाठी शासनाने मुंढवा येथे १५० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार १५० गोठ्यांचे तिथे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, हे पुनर्वसन करण्यासाठी १९८४ चा आरोग्य परवाना त्या गोठामालकाकडे असावा, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गोठ्यांचे पुनर्वसन रखडले असल्याची माहिती आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांनी सभागृहाला दिली. ही अट शिथिल करण्याच्या ठरावास मुख्य सभेने मंजुरी दिली. त्यामुळे गोठ्यांच्या स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.