शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आशियाई विजेता मल्लाची पत्नी आजही वनवासात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:40 IST

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : शहराचे वैभव म्हणून आळखले जाणाºया आशियाई कुस्ती स्पर्धेतील रौप्य पदक विजेता दिवंगत पैलवान बाबूराव गणपतराव चव्हाण यांच्या पत्नी विमलकाकी चव्हाण यांची वृद्धापकाळात आर्थिक अडचणीमुळे परवड सुरू आहे. जिल्हा क्रीडा खात्याकडून दरमहा न मिळता चार-चार महिन्यांनंतर मिळाणारे तुटपुंजे मानधन दैनंदिन गरजा पुरवण्यासही अपुरे पडत आहे.महाराष्टÑासह ...

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : शहराचे वैभव म्हणून आळखले जाणाºया आशियाई कुस्ती स्पर्धेतील रौप्य पदक विजेता दिवंगत पैलवान बाबूराव गणपतराव चव्हाण यांच्या पत्नी विमलकाकी चव्हाण यांची वृद्धापकाळात आर्थिक अडचणीमुळे परवड सुरू आहे. जिल्हा क्रीडा खात्याकडून दरमहा न मिळता चार-चार महिन्यांनंतर मिळाणारे तुटपुंजे मानधन दैनंदिन गरजा पुरवण्यासही अपुरे पडत आहे.महाराष्टÑासह देशाला सार्थ अभिमान वाटावा, असे आंतरराष्टÑीय किर्तीचे पैलवान बाबूराव चव्हाण यांनी १९५४ मध्ये मनीला (फिलिपाईन्स) येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असतानाही त्यांनी मिळविलेले यश वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या पत्नीचा मोलाचा वाटा होता.पैलवान बाबूराव चव्हाण यांचे २००१ मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली व पत्नी आहे. तिन्ही मुलींचे विवाह झाल्यामुळे पत्नी विमलकाकी एकट्याच रहिमतपूरमध्ये राहतात. राहते घर तेवढीच त्यांची मालमत्ता आहे. उदरनिर्वाहासाठी जिल्हा क्रीडा खात्याकडून त्यांना २००४ पासून चार हजार रुपये मानधन पेन्शन स्वरुपात दिले जाते. मात्र, तेही दरमहा न देता चार-चार महिन्यांनंतर मिळत असल्याने महिन्याभरचा खर्च भागवताना त्यांची दैना उडते. काकी हे ८१ वर्षांच्या असून, वृद्धापकाळाने स्वयंपाक करता येत नाही. जेवणाचा डबाही मागवावा लागतो. औषध, उपचाराचा खर्च वेगळाच आहे. तुटपुंज्या मानधनात हा खर्च भागवणे अशक्य झाले आहे. घरपट्टी, पाणीपट्टीही थकलेली आहे, अशा विदारक अवस्थेत काकी जीवन जगत आहेत.पतीचं नाव मोठं असल्यामुळे अद्याप रहिमतपूर शहरासह जिल्ह्यातून लोक घरी भेटण्यासाठी येतात. बोलता-बोलता घरची परिस्थिती बघून मदतीचा हात पुढे करतात. मात्र, ती मदत घेतानाही काकी पुढे सांगतात, ‘माझ्या पतीनं कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळवून देशाचं नाव मोठं केलं आहे. अशा खेळाडूच्या पत्नीला दोन वेळचे जेवण पुरवण्याचं कामही या सरकारला जमत नाही का? शासनाचे ते काम असूनही त्यांनी ते इमाने इतबारे केलेच पाहिजे,’ असे सांगून काकी समोरच्या व्यक्तीला गप्प बसवितात. आर्थिक अडचणींना तोंड देताना डोळ्यातून वाहणाºया अश्रूंच्या धारेला त्या रोखू शकत नाहीत.किमान २० हजार रुपये पेन्शन मिळावी...आंतरराष्टÑीय दर्जाच्या खेळाडूच्या पश्चात त्यांच्या पत्नीकडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्षकरणार असेल तर यापुढे कुठल्याही युवकाचे आई-वडील त्याला क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास परवानगी देणार नाहीत. सरकारी नोकरदारांच्या पत्नीला ज्याप्रमाणे पेन्शन मिळते. त्याप्रमाणे खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही पेन्शन मिळायला हवी. अन्यथा क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. आजच्या महागाईच्या काळात किमान २० हजार रुपये पेन्शन मिळायला हवी, अशी मागणी विमल चव्हाण यांनी केली....नाहीतर पंतप्रधानांना भेटले असतेसरकारचा शासकीय नोकरदारांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असून, खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सहावा, सातवा वेतन आयोग सरकारी कर्मचाºयांना व पेन्शनधारकांना लागू होतो, मग खेळाडू व त्यांच्या पेन्शन व मानधनधारकांना का लागू होत नाही. ती माणसं नाहीत का? खेळाडू व मानधनधारकांचे प्रश्न घेऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले असते; परंतु वृद्धापकाळाने प्रवास झेपत नाही. नाहीतर पंतप्रधानांची नक्कीच भेट घेतली असती, असेही विमल चव्हाण यांनी स्पष्ट केले.