शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 13:43 IST

महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

मुंबई - रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. जनजीवन ठप्प झाले असताना, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणतात मुंबई कुठे तुंबली आहे. यावरूनच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्ताधारी यांच्यावर टीका केली आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. असा टोला अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असताना सुद्धा महापौर  महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. असे चव्हाण म्हणाले.

मालाड आणि पुण्यात भिंत कोसळून २५ जणांचा बळी गेला आहे. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार सुद्धा कारणीभूत नाही का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना क्लीन चीट सुद्धा देईल. पण त्याने गलेले जीव परत येणार आहेत का? किंवा पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची हमी मिळणार आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी विचारला.