शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 13:43 IST

महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

मुंबई - रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. जनजीवन ठप्प झाले असताना, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणतात मुंबई कुठे तुंबली आहे. यावरूनच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्ताधारी यांच्यावर टीका केली आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. असा टोला अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असताना सुद्धा महापौर  महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. असे चव्हाण म्हणाले.

मालाड आणि पुण्यात भिंत कोसळून २५ जणांचा बळी गेला आहे. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार सुद्धा कारणीभूत नाही का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना क्लीन चीट सुद्धा देईल. पण त्याने गलेले जीव परत येणार आहेत का? किंवा पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची हमी मिळणार आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी विचारला.