शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 13:43 IST

महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

मुंबई - रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. जनजीवन ठप्प झाले असताना, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणतात मुंबई कुठे तुंबली आहे. यावरूनच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्ताधारी यांच्यावर टीका केली आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. असा टोला अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असताना सुद्धा महापौर  महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. असे चव्हाण म्हणाले.

मालाड आणि पुण्यात भिंत कोसळून २५ जणांचा बळी गेला आहे. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार सुद्धा कारणीभूत नाही का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना क्लीन चीट सुद्धा देईल. पण त्याने गलेले जीव परत येणार आहेत का? किंवा पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची हमी मिळणार आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी विचारला.