शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय : आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 12:58 IST

लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणत असताना प्रत्यक्षात हजारोंची यादी समोर आली आहे.

मुंबई : विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून देण्यात आलेल्या घोषणा पाहून आम्हालाही मागचे दिवस आठवले, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला होता. त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत, सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला असल्याचं म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले की, सत्तेत बसल्यावर विरोधकांनी आवाज उठवलेल्या मुद्यांकडे लक्ष देण्याएवजी त्यावर विकृतपणे भाष्य करणे यातूनच सत्तेचा माज दिसून येतो. मात्र सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आमचा घसा कोरडा काय, फुटला तरीही आम्ही शेतकरी आणि महिलांसाठी बोलू, असा इशारा त्यांनी यावेळी सरकाराला दिला.

तर लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणत असताना प्रत्यक्षात हजारोंची यादी समोर आली आहे. सरसकट कर्जमाफी, सात बारा कोरा या सर्व त्यांच्या घोषणा आहे. तर आम्ही वचनाला न फिरणारे असल्याचं म्हणणारे मुख्यमंत्री बांधावर जाऊन दिलेलं वचन का विसरले?, त्याची आठवण त्यांना करून देणार असल्याचे सुद्धा शेलार म्हणाले.