शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

एक्सप्रेस वेच्या 'गोल्डन अवर्स'साठी राष्ट्रीय महामार्गावर कृत्रीम वाहतूक कोंडी

By admin | Published: September 18, 2016 6:56 PM

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली अवजड वाहने रोखून धरण्याच्या प्रकारामुळे

ऑनलाइन लोकमत
लोणावळा : दि. १८ (वार्ताहर) - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली अवजड वाहने रोखून धरण्याच्या प्रकारामुळे आज एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी नव्हती. मात्र,  मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीमय होते, असं उलटं चित्र पहायला मिळालं. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या रांगा दोन ते तीन किमी अंतरापर्यत गेल्यानंतर मात्र महामार्ग पोलीसांची तारांबळ उडाली व सर्व फौजफाटा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दाखल झाला. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे तसेच या मार्गावरुन प्रवास करणार्‍या वाहनचालकांचे या कोंडीमुळे प्रचंड हाल झाले. दुपारी 3 वाजता झालेली ही वाहतूक कोंडी तीन तासांनंतरही कायम असून जवळपास 3 किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
 मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली सकाळी व संध्याकाळी काही तास एक्सप्रेस वेवरील अवजड वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक कसलेही नोटिफिकेशन न काढता ऐवढा मोठा निर्णय महामार्ग पोलीसांनी कशाच्या आधारे घेतला हा वेगळा मुद्दा असला तरी महामार्ग पोलीसांच्या या गोल्डन अवर्स संकल्पनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर कमालीची वाहतूक कोंडी होऊ लागली असून त्यांचा त्रास स्थानिक नागरिक, वाहतूकदार व चाकरमन्यांना होऊ लागला आहे. एक्सप्रेस वेवरील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर कृत्रीम वाहतूक कोंडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. 
 मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी एक्सप्रेस वेची निर्मीती करण्यात आली असताना आता पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर वाहने थांबवत कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केला जाऊ लागला आहे. एक्सप्रेस वेवरील अपघात व कोंडी रोखण्यात महामार्ग पोलीस व संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे ते अपयश लपविण्यासाठी ही अनोखी शक्कल महामार्ग पोलीसांनी लढवली असल्याची टीका आजची वाहतूक कोंडी पाहून नागरिकांनी केली आहे. याबाबत खंडाळा महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पण एकंदरीतच पोलीसांची ही शक्कल त्यांच्या अंगलट आली असून त्यांचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना भोगावा लागतो आहे.