शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास हे वैचारिक दारिद्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:01 IST

विकास असे कोणी म्हणत असेल तर ते वैचारिक दारिद्रयच म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा उल्लेख न करता गुरुवारी विधानसभेत केली.

मुंबई : कृत्रिम प्रकल्पांच्या मागे लागताना आपण काय गमावणार अन् काय कमावणार याचाही विचार केला पाहिजे. निसर्गसुंदर कोकणात कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास असे कोणी म्हणत असेल तर ते वैचारिक दारिद्रयच म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा उल्लेख न करता गुरुवारी विधानसभेत केली.कोकणच्या विकासासाठी नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणचे निसर्गसुंदर वैभव टिकविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कृत्रिम प्रकल्पांना विकास मानून जर आपण हे वैभव घालवणार असू तर त्यासारखे दुसरे वैचारिक दारिद्रय नाही.कोकणच्या विकासासाठी सिंधुरत्न समृदधी विकास योजना सुरू करण्यात आली आहे.येत्या १ मे या महाराष्ट्रदिनी चिपी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.त्याचसोबत एलईडी लाईटद्वारे सुरू असणारी मासेमारी बंद करणारा राज्याचा कायदा आणण्यात येईल.पाणबुडीच्या माध्यमातून मरीन लाईफ दाखविण्याची योजना सुरू करण्यासोबतच कोकणातील जलदुर्ग दाखविणारी समुद्री सफर देखील सुरू करण्यात येणार असल्याच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या.कोस्टगार्ड,पोलीस आदींना खोल समुद्रात चालणारी मासेमारी रोखण्यासाठी सांगण्यात आले आहे.मत्स्यदुष्काळ आदी प्रश्न सोडवण्यात येतील.डिझेलचे परतावे देण्यास सुरूवातही झाली आहे.समुद्री महामार्गाचे काम जलदगतीने पुढे नेण्यात येत आहे.तसेच प्रधानमंत्री जलमिशन योजना थांबवण्यात आलेली नाही.नळाद्वारे जलजोडणीचे काम सुरू आहे.त्याचसोबत चिपी येथील विमानतळावर उपकरणे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आंबा-काजू बोर्डाच्या समस्याही सोडविण्यात येणार आहेत.येत्या एप्रिल महिन्यात कोकणात व्हायरॉलॉजी प्रयोगशाळा देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.>मरिनलाइफसाठी पाणबुडीकोकणात मरिनलाइफचा आनंद लुटण्यासाठी पाणबुडी सुरू करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असेल. मुंबईजवळच्या एलिफंटा बेटापासून ते या सर्व जलदुर्गांची बोटीतून सफर घडविणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.