शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

ऊठ मराठ्या, मोदी (ज्यु) आले!

By admin | Updated: June 2, 2014 07:01 IST

असं म्हणतात की, पूर्वी नाटकाची जाहिरात करताना नाटकातील सार्‍या नट-नट्यांची नावे लिहून झाली की, शेवटी अत्यंत ढोबळ्या अक्षरात

हेमंत कुलकर्णी - असं म्हणतात की, पूर्वी नाटकाची जाहिरात करताना नाटकातील सार्‍या नट-नट्यांची नावे लिहून झाली की, शेवटी अत्यंत ढोबळ्या अक्षरात ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ ही अक्षरे लिहिली रे लिहिली की, प्रयोग हाऊसफुल्ल झालाच समजा! आताही बहुधा तेच आणि तसेच होईल़ विधानसभेची सारी बाके राजबाबूंच्या निष्ठावान मावळ्यांनी भरून जातील, अशी आशा (वेडी?) आणि अपेक्षा राजबाबू ठाकरे आणि त्यांच्या समस्त मावळेगणांच्या मनात उपजली असणार, याबाबत या मºहाटी मुलुखातील तमाम मराठ्यांनी नि:शंक राहण्यास हरकत नाही. श्वशुर मोहन वाघ यांच्या कन्येचा स्वीकार करतानाच राज ठाकरे यांनी श्वशुरांकडचे जाहिरात कौशल्य तर आत्मसात केलेच असणार, पण ज्या ठाकरे कुटुंबात जन्म घेतला, ते कुटुंबदेखील कोणत्याही लहान-मोठ्या निमित्तात नाट्यमयता ओतण्यात तसे तरबेजच. साहजिकच, लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आणि मनसेचा निकाल लागल्यानंतर तब्बल  २ पंधरवड्यानंतर ‘चला, आयुष्यावर बोलू काही’ अशा धर्तीची जाहिरातबाजी सुरू झाली. त्यासाठी ३१ मेचा मुहूर्त शोधूून काढला गेला. (३१-५, अरेवा, ९ची बेरीज झाली की!) लोकाना वाटले, आपण नाकारल्याचा राग येऊन राजबाबू चक्क राजकारण संन्यासबिन्यास जाहीर करून मोकळे होतात की काय! कारण गेल्या काही महिन्यांपासूनची त्यांची पुण्यातली आणि नाशकातली भाषा तशीच होती. पण नाही! महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीत मनसे सर्व ताकदीनिशी उतरणार आणि मायबाप जनतेने कौल दिला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद देखील साक्षात आपणच स्वीकारणार, अशी घोषणाच या ‘बोलू काही’मध्ये केली गेली. त्या वेळी तिथे जमलेल्या मनसे झुंडीला ही घोषणा म्हणजे साक्षात बॉम्बगोळाच वाटला. असो. बॉम्ब देखील त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टीबरहुकूम महा अथवा लघुरूप धारण करीत असतो. आता एवढी मोठी घोषणा केली म्हटल्यानंतर राज्य विधानसभेत २८८ जागा आहेत़ त्यातील किमान १४५ आपण जिंकल्याच पाहिजेत़ त्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात आपली ताकद अगोदरपासूनच उभी राहिलेली असली पाहिजे़ मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक इथल्या चिमुकल्या शिदोरीवर उभ्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे स्वप्न बघता येत नाही, इत्यादी इत्यादीचा विचार राज यांनी नक्कीच केला असणार. (हे स्वप्न साकारायचे तर सकाळी लवकर उठून रात्री उशिरा निजावे लागेल़ कार्यकर्त्यांशी सतत हिडीसफिडीस करता येणार नाही, वगैरे समजुतीच्या आणि अनुभवाच्या चार गोष्टी शरदकाका सांगतीलच) एक बरीक खरे. राज ठाकरे म्हणतात, त्यानुसार कोणत्याही निवडणुकीत कुणीही जिंकत नसतो तर कुणीतरी पराभूत होत असतो. महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीचा विचार करता, निवडणूक तोंडाशी नव्हे तर चक्क घशाशी आलेली असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी हमरीतुमरी सुरू आहे, ती पाहू जाता हे दोन्ही पक्ष पराभव स्वीकारायला आणि पचवायला किती उत्सुक आणि उतावीळ झाले आहेत, हेच दिसून येते. या पार्श्वभूमीवर आणि विशेषत: लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी म्हटले, तर चक्क नाकारल्यानंतर आणि तूर्तास तसे कोणतेही वातावरण नसताना राज यांच्या हाकेला इतक्या मोठ्या संख्येत त्यांच्या चाहत्यांनी ओ द्यावी, हे विशेषच मानावे लागेल. अर्थात पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांचे काहीसे खचलेले मनोधैर्य उंचावण्यासाठी अशी सभा आयोजित करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे यासाठी एखादी चमकदार घोषणा करणे ही स्वत: राज आणि त्यांच्या मनसेची गरजच होती, हे येथे लक्षात घ्यावे लागेल़ तथापि लोकसभा निवडणुकीत देशस्थिती जशी केवळ मोदी यांनाच अनुकूल होत गेली तसे महाराष्ट्राच्या बाबतीत नाही. ‘मॅच इज प्रिटी ओपन फॉर आॅल’! पण मोदींच्या मागे पंधरा वर्षांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द होती आणि त्यांनी विकासाचा नारा ओठावर रुळवून घेतला होता. तुलनेत राजबाबूंच्या हाती एव्हाना बहुधा जीर्ण झालेल्या महाराष्ट्राच्या चौमुखी विकासाच्या ‘नीलपत्रिकेची’ काही पाने आणि बट्ट्याबोळ झालेला नाशिक महापालिकेचा कारभार इतकेच आहे. तरीही राज ठाकरे महाराष्ट्राचे मोदी (ज्यु) बनण्याची आस बाळगून असतीलच तर किमान त्यांच्या या धार्ष्ट्याचे कवतिक करायला काय हरकत आहे?