शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागणाऱ्यास अटक

By admin | Updated: May 14, 2016 02:59 IST

जमिनीचे एक प्रकरण मंजूर करवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात गजानन लक्ष्मण पाटील या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयाजवळ अटक केली

मुंबई : जमिनीचे एक प्रकरण मंजूर करवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात गजानन लक्ष्मण पाटील या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयाजवळ अटक केली असून आरोपी मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरचे आमदार आहेत. तक्रारकर्त्या व्यक्तीची एक सामाजिक संस्था असून या संस्थेच्या एका मोठ्या जमिनीचे प्रकरण मंजुरीसाठी मंत्रालयात प्रलंबित होते. या प्रलंबित प्रकरणाचे काय झाले, याची माहिती घेण्यासाठी संबंधित व्यक्ती मंत्रालयातील महसूल विभागात गेली असता त्या ठिकाणी गजानन लक्ष्मण पाटील याने त्यांना गाठले. ‘तुमचे काम करुन देतो, पण आधी १५ कोटी रुपये आणि काम झाल्यानंतर १५ कोटी रुपये असे ३० कोटी रुपये द्यावे लागतील. मी एका अधिकाऱ्यामार्फत हे काम करवून देईन, असे सांगत पाटील याने लाच मागितली. याबाबत फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. एसीबीने तक्रारीची शाहनिशा केली असता, लाच मागण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्या नंतर एसीबीने पाटील याला शुक्रवारी सायंकाळी अटक केली. सूत्रांनी सांगितले की, महसूल विभागातील कोणत्या अधिकाऱ्याच्या नावे लाच मागितली त्या अधिकाऱ्याचे नाव आरोपी पाटील याने एसीबीला सांगितले आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्याची देखील चौकशी एसीबीने सुरू केली आहे. (विशेष प्रतिनिधी)या प्रकरणातील आरोपी गजानन पाटील हा मंत्रालयात नेहमीच वावरतो. विशेषत: महसूल विभागात त्याची जास्त उठबस असते. कामे घेऊन आलेल्यांना गाठणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे उद्योग तो करत असल्याचे समजते....तर कठोर कारवाई करा - खडसेमुंबईतील अथवा जळगाव येथील माझ्या कार्यालयात गजानन पाटील अथवा गजमल पाटील या नावाची व्यक्ती अधिकृतपणे अथवा खासगीरीत्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही. माझ्या नावाचा कोणी गैरवापर करीत असेल व ती व्यक्ती दोषी असेल तर त्यांच्याविरु द्ध कठोर कारवाई करावी, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.गजानन पाटील हे मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असून ते अधून-मधून जळगावजिल्ह्यातील गरजू रुग्णांनान वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे आणत असतात. ते तालुक्यातीलरहिवासी असल्यामुळे परिचित आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.