शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आरिफ माजिदला देणार मानसोपचार

By admin | Updated: December 3, 2014 03:53 IST

इराकमधील इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेतून परतलेला कल्याणमधील तरुण आरिफ माजिद याने तपास यंत्रणांना दिलेली माहिती उलटसुलट

डिप्पी वांकाणी, मुंबई इराकमधील इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेतून परतलेला कल्याणमधील तरुण आरिफ माजिद याने तपास यंत्रणांना दिलेली माहिती उलटसुलट आणि असंबद्ध असल्याने त्याला मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार देणार असल्याची माहिती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सूत्रांनी दिली. तसेच त्याला तपासादरम्यान घरचे जेवण देण्याची आणि कुटुंबीयांशी भेटण्याची सवलतही देण्यात आली आहे. आरिफने भारतात परत येणे ही आपली मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. आरिफच्या विचारांत मोठी अस्ताव्यस्तता दिसून येत आहे. त्याने दिलेल्या माहितीत मोठी विसंगती आहे आणि तर्कसंगतीचा अभाव आहे. तो बराचसा संभ्रमावस्थेतआहे. त्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञांकरवी उपचार देण्यात येणार आहेत. त्यानंतरच त्याच्या विचारांत सुस्पष्टता आणि तर्कसंगती येईल, असे सूत्रांनी सांगितले. आरिफने सांगितले की, त्याला युद्धक्षेत्रात फुटकळ कामे दिल्याने आणि त्याच्या आईने परत येण्यासाठी भुणभुण लावल्यानेच तो परत आला. पण परत येणे ही त्याच्या मते मोठी चूक होती. इस्लामिक स्टेटला पैशांची कमतरता नसून ते बॉम्ब बनवण्याचे तंत्र मिळवण्यासाठी इंजिनीअर्सना भरमसाठ पैसा देत आहेत. दरम्यान, आरिफच्या काकांना मंगळवारी एनआयएच्या खंबाला हिल भागातील कार्यालयात तपासासाठी बोलावले होते. आरिफला सुनावणीवेळी म्हणणे मांडण्यास मदत घेण्यासाठी कुटुंबीयांतर्फे वकिलाची नेमणूक केली जाईल का, असे विचारता त्यांनी नाही असे सांगितले.