शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जुगार अड्ड्यावर बसला आहात का? बच्चू कडूंचा भर सभागृहात आदित्य ठाकरे, जाधवांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 16:28 IST

विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. खरेतर विरोधी पक्षच राहणार नाही असे दिसतेय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते, असा टोला सुरुवातीला कडू यांनी लगावला.

आज विधानसभेत बच्चू कडू शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते. यावेळी विरोधी पक्षातील नेते ठाकरे गट, शरद पवार गटातीन नेते आपल्या जागा सोडून गप्पांची मैफिल रंगवत होते. यावर संतप्त झालेल्या कडू यांनी आदित्य ठाकरे, जाधव यांचे नाव घेऊन जुगार अड्ड्यावर बसला आहात का? असा सवाल भर सभागृहात विचारला. 

विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. खरेतर विरोधी पक्षच राहणार नाही असे दिसतेय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते, असा टोला सुरुवातीला कडू यांनी लगावला. तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागातले आहोत. २४ तासांचे वीज बिल घेतात, ८ तासच वीज देतात. हे थांबवायला हवे. विजेच्या वायर घराच्या हातभर उंचावरून जातात. जेवढे धर्माच्या नावाने मेले नाहीत तेवढे या व्यवस्थेने मारले आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. चार-पाच लाखाची मदत, गरीबाचा मृत्यू एवढा स्वस्त केलाय. आमदार खासदाराचे पोरगं मरत नाही ना म्हणून तिकडे लक्ष दिले जात नाहीय, अशी टीका कडू यांनी केली.  

दुधामध्ये भेसळ केली जात आहे. हिंदू खतरेमे है, नाही दुधामुळे खतरेमे है. जाती धर्माच्या नावाने लढतायत. तुम्ही भेसळयुक्त दूध थांबवू शकत नाही का, कशाला हे सभागृह ठेवले आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. भ्रष्टाचाराचे एकूण प्रकार काढले तर जेवढे राज्याचे बजेट नाही त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार देशपातळीवर पाहतोय. यावर लक्ष दिले नाहीतर येणारा काळ वाईट असणार आहे, असा इशारा कडू यांनी दिला. 

यावेळी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्यांकडे बोट दाखवून अध्यक्षांना कडू यांनी तिकडे वेगळे सभागृह सुरु असल्याचे म्हटले. जयंत पाटील, आव्हाड हे आपली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले होते. पुन्हा पुन्हा हे होताना पाहून आदित्य ठाकरे, जाधव हे शिवसेनेचे लोक एवढी चर्चा करतायत की हे सभागृहात आहेत की बाहेर बसलेत. जुगार अड्ड्यावर बसला आहात का? असा सवाल कडू यांनी विचारला. एकतर तुम्ही आम्ही तिकडे बसलो होतो, आता इकडे बसलोय आता तिकडे न्यायचा विचार आहे का, मी चारवेळा निवडून आलोय, अशा शब्दांत कडू यांनी ठाकरे गटाला फटकारले आहे.  

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAditya Thackreyआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभाShiv Senaशिवसेना