शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

दुधाच्या भावासाठी रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट बघताय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 04:23 IST

राज्यात समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे.

नागपूर : राज्यात समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट बघत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनाचे पडसाद दुसºया दिवशीही सभागृहात उमटले. या अनुषंगाने नियम ९७ अन्वये उपस्थित अल्पकालीन चर्चेत विरोधकांनी आक्रमक भूमिका मांडली. देशातील पहिला शेतकरी संप राज्यात झाला. मार्च महिन्यात मुंबईच्या विधानभवनावर शेतकºयांचा पायी मोर्चा आला होता. आता शेतकºयांना रस्त्यावर दूध ओतावे लागत आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकºयांना न्याय द्यायचाच नाही, असे सरकारने धोरण ठरवले आहे काय असा सवाल मुंडे यांनी केला. सरकारने २६ जून २०१७ रोजी गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३६ रुपये भाव जाहीर केला. मात्र, शेतकºयांना केवळ १७ रुपये भाव मिळत आहे. घोषणा करून दूध उत्पादकांचे पोट भरणार नाही. तर दुधाला प्रति लिटर ५ रुपये तर दूध भुकटीला ५० रुपये अनुदान देण्याची मागणी मुंडे यांनी केली. विरोधकांनीही हा प्रश्न लावून धरला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले. दुग्धविकास राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कालच्या शेतकरी दुधात पाणी टाकतात या वक्तव्याचा समाचार घेताना सरकारला शेतकºयांच्या वेदना समजत नाहीत. दुधातले पाणी कसे दिसते? असा सवाल केला. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना एका दूध उत्पादक शेतकºयाने फोन केल्यानंतर त्या शेतक ºयाच्या ५५ वर्षाच्या वडिलांना जेलमध्ये टाकण्याचा, चौकशी करण्याच्या कृतीचाही त्यांनी समाचार घेतला. नीलम गोºहे म्हणाल्या, बाहेरील राज्यातून येणाºया दुधाला राज्य सरकारने लिटरमागे तीन रुपये कर लावावा. तरच राज्यातील दूध संस्थांना स्पर्धा करता येईल. विनायक मेटे यांनी दूध माफियावर नियंत्रण घालण्याची मागणी केली. रामहरी नुपवर यांनी दूध उत्पादकांचा संप मिटावा यासाठी सरकारने अनुदानाची घोषणा करावी अशी मागणी केली.>मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक घ्याराज्यात दूध उत्पादकांचे आंदोलन सुरू असतानाही दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर ठोस निर्णयाची घोषणा केली नाही. अखेर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची दोन दिवसात बैठक बोलवा, यात शेतकºयांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करा, असे निर्देश दिले.

 

टॅग्स :milkदूध